महाराष्ट्राचे चार भाग करा; मा. गो. वैद्यांची वादग्रस्त मागणी

मुंबई | जर महाराष्ट्राची 11 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असेल तर राज्याचे 3 किंवा 4 भाग होतील. तसेच छोट्या राज्यासाठी केंद्र सरकारनं प्रांत रचना आयोग नेमावा, अशी वादग्रस्त मागणी संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी केली आहे.

मा. गो. वैद्य यांनी महाराष्ट्र राज्याचे चार भाग करा अशी मागणी केल्याने यावरून एका नव्या वादाला तोंड फुटणार असल्याचं दिसत आहे.

वैद्या यांनी केलेल्या वक्तव्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर जोदार टीकास्त्र सोडलं आहे. तसेच महाराष्ट्राला तोडण्याची भाषा करू नका, अशी टीका विरोधकांनी वैद्या यांच्यावर केली आहे.

दरम्यान, राज्याची पूनर्रचना आवश्यक आहे. ज्यात विदर्भ वेगळा होईल. कोणत्या राज्याची लोकसंख्या ही 3 कोटींच्या वर नको आणि एक कोटींपेक्षा कमी नको. हे यापूर्वी अनेकांनी सांगितले. म्हणूनच गोवा महाराष्ट्रापासून वेगळं आहे, असंही वैद्य यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-