मुंबई | बंधपत्रित डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा तसेच कंत्राटी डॉक्टर्सचे आणि त्यांचे मानधन समान करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय जाहीर केला. तसेच राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही ट्वीट करत याबाबतची माहिती दिली.
सरकारच्या या निर्णयामुळे कोरोना लढाईला निश्चितपणे बळ मिळणार आहे. वाढीव मानधनानुसार आता आदिवासी भागातील बंधपत्रीत डॉक्टर्सना 60 हजारांच्या ऐवजी 75 हजार रुपये मानधन मिळणार आहे.
आदिवासी भागातील बंधपत्रीत विशेषज्ञ डॉक्टर्सना 70 हजार ऐवजी 85 हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. तर इतर भागातील एमबीबीएस डॉक्टर्सना 55 हजारांऐवजी 70 हजार रुपये मानधन आणि इतर भागातील विशेषज्ञ डॉक्टर्सना 65 हजारांऐवजी 80 हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.
CM Uddhav Balasaheb Thackeray has announced a substantial hike in the honorarium of doctors serving their bonds to bring it at par with doctors working on contract basis. This will further strengthen their resolve in this #WarAgainstVirus
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 29, 2020
Henceforth, doctors serving their bonds in tribals areas will get ₹75,000 instead of ₹60,000.
Specialist doctors working in tribal areas will be paid ₹85,000 from the previous ₹70,000.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 29, 2020
MBBS Doctors in other areas will see their honorarium rise to ₹70,000 from ₹55,000.
Specialist doctors in other areas will get an honorarium of ₹80,000 instead of ₹65,000.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 29, 2020
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज बंधपत्रित (बॉण्डेड) डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा तसेच कंत्राटी डॉक्टर्सचे व त्यांचे मानधन समान करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे कोरोना लढाईला निश्चितपणे बळ मिळणार आहे तसेच डॉक्टर्सना सुद्धा यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 29, 2020
वाढीव मानधनानुसार आता
आदिवासी भागातील बंधपत्रीत डॉक्टर्सना ₹६०,००० ऐवजी ₹७५,०००
आदिवासी भागातील बंधपत्रीत विशेषज्ञ डॉक्टर्सना ₹७०,००० ऐवजी ₹८५,०००
इतर भागातील MBBS डॉक्टर्सना ₹५५,००० ऐवजी ₹७०,०००
इतर भागातील विशेषज्ञ डॉक्टर्सना ₹६५,००० ऐवजी ₹८०,००० मानधन देण्यात येईल.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 29, 2020
महत्वाच्या बातम्या-
-सचिन सावंत हे खोटं बोलण्याची फँक्टरी आहे- आशिष शेलार
-अक्षय बोऱ्हाडेप्रकरणी आढळरावांचा मोठा निर्णय, खा. कोल्हेंना धक्का!
-सामूहिक शक्तीच्या जोरावर कोरोनाला आपण निश्चितच हरवू- अजित पवार
-संकटातही बळीराजाची दिलदारी; कोरोना लढ्यासाठी लावला मोठा हातभार
-“कोरोनाच्या संकटात समाजकार्य करा, साहेबांच्या स्मृतीदिनी गडावर गर्दी नको”