मुंबई | मागील काही दिवसांपासून देशातील तज्ज्ञांनी देशात लवकर कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) येणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर आता भारतात कोरोनाची तिसरी लाट आल्याचं दिसत आहे.
केंद्र सरकारने सर्व राज्यांना निर्बंध कडक करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रात देखील ठाकरे सरकार आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे.
अशातच आता मागील काही दिवसांपासून राज्याच्या आकडेवारीत अचानक वाढ झाल्याचं दिसत आहे. दिवसेंदिवस रूग्णसंख्या वाढत असल्याने आता आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राज्यात आज देखील मोठ्या प्रमाणात रूग्णसंख्या वाढली आहे. आज तब्बल 26 हजार 538 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 5,331 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
3 जानेवारी रोजी राज्यातील नवीन रूग्णसंख्या 12, 160 होती आता नवी रुग्णसंख्या 26 हजारावर गेली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारची चिंता देखील वाढली आहे.
राज्यात आज 144 ओमिक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत 797 ओमिक्रॉन बाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता ओमिक्राॅन देखील झपाट्याने वाढत असल्याचं दिसतंय.
गेल्या 2 दिवसांमध्ये राज्यातील नवीन रूग्णसंख्या ही दुप्पट झाल्याचं पहायला मिळतंय. तर राजधानी मुंबईमध्ये देखील कोरोना हातपाय पसरत असल्याचं दिसून आलं आहे.
दरम्यान, मुंबईत गेल्या 24 तासांत 15 हजार 166 नव्या रुग्णाची भर पडली आहे. त्यामुळे आता मुंबईत लाॅकडाऊन लागण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“नाना मोदींबद्दल तोंड सांभाळून बोला”, चंद्रकांत पाटलांचा सज्जड दम
मोदींचा ताफा अडवला अन् ‘फुलराणी’ भडकली, म्हणाली…
पंतप्रधानांच्या सुरक्षेत मोठी चूक, पंजाबमधील रॅली रद्द; भाजप नेत्यांची आक्रमक भूमिका
चारचौघांमध्ये राडा!, महाविकास आघाडीतील नेत्यांच्या भांडणाचा दुसरा व्हिडीओ व्हायरल
आत्ताची सर्वात मोठी बातमी! ‘या’ तारखेपर्यंत राज्यातील सर्व महाविद्यालये बंद