आलियानं लग्नच करू नये अशी महेश भट यांची इच्छा; जाणून घ्या काय आहे कारण

मुंबई| बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक अशा चमत्कारिक घटना घडत असतात. आपल्यासारख्या सर्वसामान्यांना त्या ग्लॅमरस् दुनियेमागील वास्तव फारसं माहिती नसतं. आपण समजतो तसं सेलिब्रिटीचं जगणं साधं सोप नाही, त्याला अनेक पदर असतात.

सध्या प्रसिद्ध अभिनेञी आलिया भट्ट तिच्या एका चिञपटामुळे चांगलीचं चर्चेत आली आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित गंगुबाई काठियावाडी या चिञपटामध्ये ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे .त्यामुळे सध्या ती चर्चेत असणारी अभिनेञी आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट आलियाचे वडिल आहेत. महेश भट्ट नेहमीच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. परंतु आता ते आलियाच्या लग्नाविषयी चर्चेत आले आहेत.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या रिलेशनशिप बद्दल सोशल मीडियावर सतत बातम्या व्हायरल होत असतात. पण आता त्यांच रिलेशन अगदी लग्नापर्यंत पोहचलं आहे. रणबीर आणि आलियाच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या असून रणबीरची आई नीतू सिंगला आपल्या लेकाच्या लग्नासाठी अगदीचं ओ़ढ लागली आहे. तर आलियाचे वडिल महेश भट्ट यांनी आपली लेक लग्न करून जाऊ नये असं वाटतं.

महेश भट्ट आपल्या दोन्ही मुलींबद्दल जरा जास्तच पजेसिव्ह आहेत. त्यांना आलिया आणि शाहिन यांनी सासरी जाऊ नये असं वाटत. पण आलियाच्या बाबतीत ते अतीचं पजेसिव्ह आहेत. या गोष्टीचा खुलासा आलियाने एका मुलाखतीमध्ये केला होता.

एकदा महेश भट्ट यांनी चक्क आलिया आणि शाहिनला धमकीच दिली होती. मी तुम्हाला कधीच नजरेआड जाऊ देणार नाही. तुम्ही कुठेही जाऊ शकणार नाही. तुम्हाला मी खोलीत डांबून ठेवेल. तसंच कधी लेकीची स्क्रिनवरचा किसींग सीन आला किंवा रियल लाईफ डेटिंग बद्दल काही चर्चा झाली तर ते आणखीच पजेसिव्ह होतात.

एका मुलाखतीमध्ये आलियाने धमकीबद्दल गोष्ट खरी असल्याच सांगितलं होतं. पप्पा शाहिनसाठी आणि माझ्यासाठी खरचं खूप पजेसिव्ह आहेत. मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. तुम्ही तसा प्रयत्न केला तर तुम्हाला मी खोलीत डांबून ठेवेन, असे पप्पा म्हणाले. आम्ही दोघींनी लग्न करू नये असं त्यांना वाटतं. ते आमच्या दोघींना दूर जाताना बघू शकत नाही. ते फक्त असं बोलत नाही, ते खरोखर करून दाखवतील. कारण ते आमच्यासाठी खूप पजेसिव्ह आहेत. त्यामुळे ते आमच्या लग्नाला विरोध करत आहे, असं आलियाने एका मुलाखतमध्ये सांगितलं होत.

महत्वाच्या बातम्या-

रोज वेलची खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे

जाणून घ्या! पुण्यात आज ‘इतके’ रुग्ण कोरोनाबाधित

शेवटच्या चार षटकांसाठी कर्णधार झाला अन् त्यानं गेलेला सामनाच…

जब्याच्या शालूनं लावली सोशल मीडियावर आग; ‘या’ गाण्यावरील अदा…

“…म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आरोग्यमंत्री…

नागपूरात पोलिसांनी हटकल्यानं महिलेचा भररस्त्यात राडा,…