नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी देशाच्या जीडीपी दरात झालेल्या घसरणीबद्दल मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. भारतातल्या आर्थिक क्षेत्रात आलेल्या मरगळीसाठी त्यांनी मोदी सरकारला जबाबदार ठरवले आहे. ही आर्थिक मंदी मानवनिर्मित असून ढिसाळ व्यवस्थापनामुळे निर्माण झाली आहे, असं ते म्हणाले.
गेल्या तिमाहीत जीडीपी विकास दर 5 टक्के होता. यातून हे स्पष्ट होतं की देश मोठ्या स्लोडाऊनमधून जात आहे. भारताकडे जास्त वेगाने विकास करण्याची क्षमता आहे, पण मोदी सरकारच्या अव्यवस्थापनामुळे परिस्थिती बिघडली आहे, असं मनमोहन सिंह यांनी सांगितलं आहे.
उत्पादन क्षेत्राचा विकास अवघा 0.6 टक्के आहे. आपली अर्थव्यवस्था नोटाबंदीसारख्या मानवनिर्मित चुकांमधून अद्याप बाहेर आलेली नाही. हेच यातून स्पष्ट होतं. याव्यतिरिक्त चुकीच्या पद्धतीने लागू करण्यात आलेल्या जीएसटीमुळेही अर्थव्यवस्था डबघाईला गेली आहे, असंही मनमोहन सिंह म्हणाले आहेत.
देशांतर्गत मागणी आणि वापराचे प्रमाण 18 महिन्यांतील सर्वाधिक कमी आहे. जीडीपचे प्रमाण 15 वर्षांतील सर्वात कमी आहे. कर महसूल कमी आहे. लहानातल्या लहान व्यापाऱ्यापासून मोठ्या उद्योगपतींपर्यंत सर्वांना ‘कर दहशतवादाची’ धास्ती सतावते आहे. गुंतवणुकदारांमध्ये साशंकतेची परिस्थिती आहे. अर्थव्यवस्था ज्या गर्तेत सापडली आहे, तेथून बाहेर येण्याची शक्यता आता नाही, असंही ते म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
”फोटो लावा किंवा संपत्ती जप्त करा पण ‘या’ अधिकाऱ्याला अटक करा”https://t.co/R78BFgkNSz #धान्यघोटाळा
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 1, 2019
उदयनराजेंच्या नव्या चर्चा; भाजपच्या डोक्याला शॉट! – https://t.co/F6BCZ0nEjz @Chh_Udayanraje @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 1, 2019
नवा महाराष्ट्र घडवण्याची हीच ती वेळ आहे; वरळीत शिवसेनेची पोस्टरबाजी – https://t.co/Un3FFDU196 @AUThackeray @ShivsenaComms
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 1, 2019