नवी दिल्ली | 14 जून रोजी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येनंतर संपूर्ण देश हळहळला. यादरम्यान सुशांतच्या चाहत्यांनी बॉलिवूडमध्ये सुरु असलेल्या घराणेशाहीवर टीका केली. तर एका भारतीय क्रिकेटरने प्रसारमाध्यमांवरही टीका केलीये.
भारतीय संघाचा फलंदाज मनोज तिवारी यांनी सुशांतच्या आत्महत्येनंतर प्रसारमाध्यमांवर निशाणा साधलाय. याविषयी त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे.
प्रसारमाध्यमांद्वारे जेवढ्या तैमूरच्या बातम्या दिल्या जातात त्यातून पत्रकारांनी जागं व्हावं आणि सुशांत सिंग राजपूतबद्दलच्या बातम्या दाखवाव्या. सुशांतच्या आत्महत्येनंतर कोणीही प्राईम टाईमला चर्चासत्रंही आयोजित केलं नाही. सध्या संपूर्ण देशाला सुशांतच्या प्रकरणाबद्दल जाणून घ्यायचं आहे, असं मनोजने म्हटलंय.
सुशांतने त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्यानंतर बॉलिवूमधील घराणेशाहीचा मुद्दा चर्चेत आला. यावरून अनेक स्टारकिड्सना ट्रोलही करण्यात आलं.
महत्वाच्या बातम्या-
-कामगारांनो…सरकारला फक्त ‘ही’ 3 कागदपत्रं द्या अन मिळवा 6000 रूपये
-कोरोनिल औषध वादाच्या भोवऱ्यात; रामदेव बाबा यांच्यासह या 5 जणांवर गुन्हा दाखल
-‘अरे गोपीचंदा… लायकी पाहून बोलावं’; अजित पवारांचं पडळकरांना उत्तर
-कोरोनावर इंजेक्शन निघालंय पण…; पाहा शरद पवार काय म्हणाले
-इतिहासात अशी इंधन दरवाढ मी पाहिली नाही- शरद पवार