“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजकारणातील हरिश्चंद्र”

मुंबई | आज ठाकरे सरकारचा विश्वासदर्शक ठराव विधीमंडळात पार पडला. महाविकास आघाडीच्या बाजूने 169 सदस्यांची मत पडली. त्यामुळे त्यांनी विश्वासदर्शक ठराव सहजरित्या जिंकला. त्यानंतर अनेक आमदरांनी आपली मत मांडली. त्यामध्ये प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं आहे.

उद्धव ठाकरे हे राजकारणातील हरिश्चंद्र आहेत असे मी मानतो. उद्धव ठाकरे शब्दाला जागणारे असून बाळासाहेबांकडून त्यांना राजकारणातील बाळकडू मिळालं आहे, अशा शब्दांत आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं आहे.

विधानसभेत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडी सरकारने विश्वादर्शक ठराव जिंकला आहे. महाविकास आघाडीच्या बाजूने 169 सदस्यांची मत पडली. त्यामुळे त्यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. मात्र 4 सदस्य तटस्थ राहिले.

विश्वासदर्शक ठरावाची चाचणी पार पडत असताना ‘नही चलेगी नही चलेगी, दादागिरी नही चलेगी’ अशा घोषणा भाजप आमदारांकडून देण्यात आल्या. अधिवेशनाला सुरुवात होताच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे अधिवेशन संविधानाच्या तरतुदीप्रमाणे होत नसून बेकायदेशीर असल्याचा आरोप केला.

महत्वाच्या बातम्या-