ठाणे | कल्याण-डोबिंवलीत यंत्रणा अपूरी पडत आहे. इथे टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रिटमेंट, ट्रॅकिंग हा फॉर्म्युला औषध सापडत नाही. त्यामुळे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी धारावीप्रमाणे कल्याण-डोंबिवलीचीदेखील पाहणी करावी, अशी मागणी कल्याण-डोंबिवली ग्रामीण मतदारसंघाचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ट्विटरवर केली आहे.
कल्याण-डोंबिवलीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दररोज वाढताना दिसत आहे. शहरात आज आणखी 6 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. कल्याण-डोंबिवलीतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 49 वर पोहोचली आहे.
25 डोंबिवली पूर्व, 7 डोंबिवली पश्चिम, 9 कल्याण पूर्व, 7 कल्याण पश्चिम तर टिटवाळ्याचा 1 रुग्ण आहे. यापैकी 8 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून दोघांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केडीएमसीकडून बऱ्याच उपाययोजना केल्या जात आहेत. शहरातील किराणा माल आणि इतर जीवनाश्यक दुकाने सकाळी 5 ते दुपारी 2 वाजेपर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
कल्याण डोंबिवली #COVID19 चा #Hotspot बनला आहे. इथे testing, tracing, treatment, tracking,हा फार्मुला औषधाला पण सापडत नाहीये. #COVID19 बाधितांचा माग काढण्यात यंत्रणा अपूरी पडत आहे.धारावीची केली तशी #KDMC ची पाहणी करणे गरजेचे आहे. @rajeshtope11 @CMOMaharashtra @KDMCOfficial
— Raju Patil (@rajupatilmanase) April 10, 2020
महत्वाच्या बातम्या –
-“किरीट सोमय्या यांच्या वक्तव्याला गांभीर्यानं घेण्याची गरज नाही”
-बीएमसीच्या मदतीसाठी अक्षय कुमार धावला, मास्क आणि टेस्टिंग किट्ससाठी केली इतक्या कोटींची मदत
-कामापेक्षा मोठा कोणता ‘धर्म’ नाही या गोष्टीची जाणीव झाली- सत्यजीत तांबेvvvvv
-बारामतीत ‘भिलवाडा पॅटर्न’ राबवा- अजित पवार