“भारतातील मुसलमानांचा मुघलांशी संबंध नाही, पण त्यांच्या बायका कोण होत्या?”

मुंबई | भारतातील मुसलमानांचा मुघलांशी कसलाही संबंध नाही. पण हे सांगा, की मुघल बादशहांच्या बायका कोण होत्या? , असा सवाल एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी व्यक्त केला आहे.

पुष्यमित्राने तोडलेल्या बौद्ध मंदिरांसंदर्भात भाजप का भाष्य करत नाही?, असा सवाल असदुद्दीन ओवैसी यांनी उपस्थित केला होता.

मी सरकारला सांगू इच्छितो, की आम्ही एक बाबरी मशीद गमावली आहे. आता दुसरी मशीद कदापी गमावणार नाही, असंही असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं आहे.

तुम्ही न्यायाची हत्या करून आमची मशीद हिसकावली आहे. दुसरी मशीद हिसकावू शकणार नाही, हे लक्षात ठेवा, असंही ओवैसी म्हणालेत.

कायद्याचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. मशीद किंवा मंदिर पाडायचं असेल तेव्हाच या कायद्याचा उल्लेख करता येईल. ते बेकायदेशीर नाही, असं ओवैसी म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

“तेल लावलेल्या पैलवानाची गुडघ्यात अक्कल असलेल्या पैलवानासोबत युती”

रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

“…म्हणून या सरकारचं नाव जुम्मे के जुम्मे सरकार”

‘तोपर्यंत आम्ही झोपणार नाही आणि झोपूही देणार नाही’; फडणवीस कडाडले

‘दौरे रद्द करून मुख्यमंत्री बनता येणार नाही’, शिवसेनेची बोचरी टीका