तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचाय मला; नाना पाटेकरांची पूरग्रस्तांना मदत

सांगली : कोल्हापूर आणि सांगलीतील भीषण पूरस्थितीचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र पुढे सरसावला आहे. कोल्हापूर आणि सांगलीतील स्थानिक नेते, सामाजिक संघटना, समाजसेवक यांसह अनेकांनी मदतीसाठी स्वत:ला झोकून देऊन काम केलं आहे. सांगलीतील शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीला संवेदनशील अभिनेता नाना पाटेकरही धावले आहेत. नाना आज सांगलीतील 5 गावांना भेटी देणार असून तेथे मदतकार्य करत आहे.

तुम्ही काळजी करू नका. छप्पर आलं की सगळं काही नीट होईल. आपण सर्व मिळून पुनर्वसन करू, असं आश्वासन देत नाना पाटेकर यांनी पूरग्रस्तांना दिलासा दिला आहे. 

मंगळवारी दुपारी 4 पर्यंत सुमारे 6 टन अन्न, पाणी आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कुरूंदवाड, कवठेगुलंद आणि कनवाड येथे करण्यात आला. अखेर सांगली आणि कोल्हापूरमधील पूरग्रस्तांसाठी 40 टन मदत साहित्य या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पाठविण्यात आले आहे.

‘नाम’ या सामाजिक संस्थेचे प्रमुख नाना पाटेकर यांनी सांगलीतील पूरग्रस्त भागांना भेट दिली. शिरोळमध्ये 500 घरं बांधून देणार असून त्यासाठी जागा निश्चित करत असल्याचे नानाने सांगितले. नाम फाऊंडेशनच्या कार्याप्रमाणेच पूरग्रस्तांनाही मदत करणार असल्याचं नानाने यावेळी म्हणाले.

मी सर्वांचा अतिशय आभारी आहे, येथे सर्वचजण मदत करताना मला दिसत आहेत. इथं जेवण पाहिलं, किती चांगलं जेवण आहे, कुणी दिलंय हे?. आपणच सर्वांनी ही मदत केलीय, असंही नाना पाटेकर म्हणाले आहेत.

सर्वांच्या मदतीनंच हे पुनर्वसन शक्य असल्याचे नानाने म्हटले आहे. सरकारही त्यांचं काम करतंय, सरकार म्हणजे कोण रे… माणसंच आहेत ना, असे म्हणत सरकारही मदतकार्यात सोबत असल्याचे नानाने सूचवले आहे.

दरम्यान, नानाला पाहून अनेकजण भावूक झाले होते, तर कित्येकांना अश्रू अनावर झाले होते.

महत्वाच्या बातम्या-

-कलम 370 रद्द झाल्यावर भाजपला ‘अच्छे दिन’; सदस्यांची संख्या झपाट्यानं वाढली

-भारताचं मालिका विजयाचं लक्ष; आज तिसरी अंतिम लढत

-नारायण राणेंचा मनसेच्या आंदोलनाला पाठिंबा???

-मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा 21 ऑगस्टपासून सुरु होणार

-स्वातंत्र्यदिनी वीरपुत्राचा ‘वीरचक्र’ने होणार सन्मान