मंत्री नवाब मलिक यांचा खळबळजनक दावा, म्हणाले…

पुणे | पुण्यात महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) कार्यकर्त्यांकडून आज नवाब मलिकांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी बोलताना मंत्री नवाब मलिक यांनी खळबळजनक दावा केला आहे.

एनसीबी झाली आता ईडीची भारी, असं म्हणत नवाब मलिकांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. मलिकांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

एनसीबी झाली, आता ईडीची बारी आहे. मी आता ईडीचा पर्दाफाश करणार. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भंडाफोड करण्यासाठी हायड्रोजन बॉम्ब मी अजून फोडलेला नाही. तो योग्यवेळी नक्कीच फोडेन, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

माझ्याकडेही भाजपवाल्यांच्या अशा सीडी आहेत की ज्या लावल्या तर यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही, असा खळबळजनक दावा नवाब मलिकांनी केला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या आधी ईडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना समन्स बजावण्यात आले होते. शरद पवारांनी त्यावेळी ईडीच्या कार्यालयात जावं, ही भूमिका त्यावेळी सर्वप्रथम मी पक्ष बैठकीत मांडली होती. पवारांनी ती उचलून धरताच पुढे काय झालं हे आपल्या सर्वांना माहितच आहे, असं नवाब मलिकांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे.

ईडीच्या कारवाईविरोधात कायदेशीर मार्गाने नाहीतर राजकीय मार्गानेच प्रत्युत्तर द्यावं लागेल, असं मी त्यावेळीच शरद पवारांना सांगितलं होतं, असं नवाब मलिक म्हणाले.

दरम्यान, देश पातळीवर शरद पवार काँग्रेसला सोबत घेऊनच भाजपविरोधात विरोधकांची मोट बांधतील. काळजी नसावी, असं त्यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“कंगनाच्या स्वागतापेक्षा ममतांचं स्वागत नक्कीच चांगलं” 

‘पुढील 2 आठवडे भारतासाठी खूप महत्वाचे’; Omicron बाबत तज्ज्ञांनी दिली ही महत्त्वाची माहिती 

प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला स्पष्टच सांगितलं, ‘तुमचा 10 वर्षात 90 टक्के पराभव झालाय त्यामुळे…’ 

“लस प्रमाणपत्रावर स्वतःचा फोटो छापता तर लोकांच्या मृत्यूची जबाबदारी देखील घ्या” 

देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार?; केंद्र सरकारचं मोठं वक्तव्य