शिक्षक भरती झालीच पाहिजे… पोलिस भरती झालीच पाहिजे; राष्ट्रवादी युवकचा सरकारविरोधात एल्गार

पुणे |  वाढत्या बेरोजगारीच्या विरोधात मंगळवारी मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’ वरील उर्से टोलनाक्यावर राष्ट्रवादी युवकच्या काँग्रेस शेकडो कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वरपे आणि पुणे जिल्ह्याचे युवक अध्यक्ष सचिन घोटकुले यांनी आंदोलनाचं नेतृत्व केलं.

शिक्षक भरती झालीच पाहिजे… पोलिस भरती झालीच पाहिजे… रिक्त असलेल्या जागा शासनाने भरल्याच पाहिजे, अशा घोषणांनी राष्ट्रवादी युवकने परिसर दणादून सोडला होता. 

अर्थव्यवस्थेची झालेली दैना, त्याचा नोकऱ्यांवर होणार परिणाम, युवकांमधील वाढलेली बेरोजगारी या प्रश्नांवर विद्यमान सरकारला राष्ट्रवादी युवकने अनेक सवाल विचारले. 

कुठे गेले अच्छे दिन?? कुठे आहेत 2 कोटी रोजगार?? आज अनेक नामवंत कंपन्यांनी आपलं उत्पादन थांबवलंय. युवकांच्या हाताला काम नाहीये. विद्यमान शासनाचं काही कर्तव्य आहे की नाही? असे सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी युवकने भाजप शासनाचा यावेळी निषेध केला.

महत्वाच्या बातम्या-