मुंबई | अभिनेता सुशांत सिंह मृत्युच्या प्रकरणावरून बराच गदारोळ चालू आहे. सुशांतच्या आत्महत्येवरून राजकीय वातावरण तापलं आहे. आता काही वेळापुर्वी विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सुशांतच्या आत्महत्येबाबत मुंबई पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह करण्यासारखं ट्विट केलं. मात्र आता भाजप नेते निलेश राणे यांनीही ट्विट करत सरकारवर या प्रकरणावरून गंभीर आरोप केले आहेत.
दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे मुंबईच्या पोलीस आयुक्तांना भेटायला जातात. त्यानंतर लगेच आज पोलीस आयुक्त पत्रकार परिषद घेतात. काहीतरी गडबड आहे हे न समजण्याइतकी लोकं मूर्ख नाहीत. जसे दिवस जात आहेत तसे टी गँग पुरावे नष्ट करत आहे. म्हणून रोज धडपड सुरू आहे, अशी शंका निलेश राणे यांनी उपस्थित केली आहे.
अपघाती मृत्यूची नोंद करुन मुंबई पोलिसांनी आधीच तपास सुरु केला आहे. आम्ही फॉरेन्सिक एक्सपर्ट, डॉक्टरांच्या टीमचा सल्ला घेतला आहे. नैसर्गिक मृत्यू आणि संशयास्पद मृत्यू या दोन्ही बाजूने मुंबई पोलिस तपास करत आहेत, असं मुंबई पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं.
दरम्यान, सुशांत सिंह राजपूत यांच्या कुटुंबाचा जबाब नोंदवला आहे. त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही. आमचा तपास सुरू आहे. परंतु पोलीस निष्कर्षावर पोहोचलेले नसल्यांचही परमवीर सिंह यांनी सांगितलं.
दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे मुंबई पोलिस कमिश्नरांना भेटायला जातो त्या नंतर आज कमिश्नर प्रेस घेतात. काही तरी गडबड आहे हे न समजण्या इतकी लोकं मूर्ख नाही. जसे दिवस जातायत तसे T gang पुरावे नष्ट करत आहेत म्हणून रोज धडपड सुरू आहे. https://t.co/MnV9JtKNgz
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 3, 2020
महत्वाच्या बातम्या-
- धक्कादायक! प्रेमाचं नाटक करत विधवा महिलेवर ‘या’ नेत्याने केला बलात्कार
- मॅडम, मुंबई पोलिसांची सुरक्षा घेऊन त्यांच्यावर इतके नीच आरोप करता?, मग…; अमृता फडणवीसांना शिवसेनेचे प्रत्युत्तर!
- ‘लफडेबाज सुशांतची लायकी तरी काय आहे त्याने आत्महत्याच केली असावी’; संभाजी भिडेंची सुशांत आत्महत्या प्रकरणात उडी
- धक्कादायक! पुण्यात पोलिसांनीच घडवून आणला शेतकऱ्यावर खुनी हल्ला अन् मग…
- अयोध्या राममंदिरातील रामाच्या मूर्तीला मिशा असाव्यात; संभाजी भिडेंची मागणी