“नारायण राणेंनी शिवसेना सोडून चूक केली”

मुंबई : 2005 मध्ये शिवसेना सोडून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी चूक केल्याचं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. त्याचवेळी काँग्रेसमध्ये गेल्यावर आपल्याला मुख्यमंत्रिपद मिळेल, यावर नारायण राणे यांनी उगीचच विश्वास ठेवला, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं. नारायण राणे यांच्या ‘नो होल्ड्स बार्ड’ या आत्मचरित्राच्या प्रकाशनाच्या निमित्ताने त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

नारायण राणेंचं इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषेमध्ये हे आत्मचरित्र प्रकाशित झालं आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात शुक्रवारी संध्याकाळी हा कार्यक्रम झाला. शरद पवार, नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

मला वैयक्तिक असे वाटते की नारायण राणे यांनी 2005 मध्ये शिवसेना सोडायला नको होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते विश्वासू सहकारी होते. बाळासाहेबांनी त्यांना अनेक मोठी पदे दिली होती. पक्ष सोडल्यानंतर नारायण राणे द्विधा मनःस्थितीत होते, असं शरद पवार म्हणाले आहेत. 

नारायण राणेंनी काँग्रेसमध्ये जावं की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये. त्यावेळी त्यांनी माझी भेटही घेतली होती. आता त्यांनी काँग्रेसमध्ये जाऊन चूक केली का?, हे मला माहिती नाही, असं शरद पवारांनी सांगितलं आहे. 

नारायण राणेंना असे वाटले की मुख्यमंत्रीपदाची त्यांनी केलेली मागणी काँग्रेसमध्ये पूर्ण होईल. पण काँग्रेस हा असा पक्ष आहे की तिथे कोणतेही निर्णय वेगाने घेतले जात नाहीत. राणे त्या संस्कृतीत नवीन होते. पण माझ्यासारख्या नेत्याला हे पक्के माहिती आहे की काँग्रेसमध्ये नेत्यांना आश्वासने दिली जातात. पण ती पूर्ण होतील की नाही, हे सांगू शकत नाही, असा टोला शरद पवार यांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या-

-…आता खासदार झालो तेही माझ्या मर्जीने नाही- नारायण राणे

-मोदी सरकारच्या ‘त्या’ निर्णयावर शिवसेना समाधानी!

-रवी शास्त्रींची पुन्हा एकदा भारताच्या प्रशिक्षकपदी निवड!

-“महापालिकेचे 58 हजार कोटी फिक्स डिपॉझिट तरीही मुंबई दर पावसाळ्यात तुंबते”

-सैफने केलं स्मिता तांबेच्या अभिनयाचं कौतुक; म्हणाला…