‘धर्म बदल नाहीतर…’; दिवंगत गायक वाजिद खानच्या पत्नीचे वाजिदवर गंभीर आरोप!

मुंबई | चित्रपट सृष्टीसाठी 2020 हे वर्ष अतिशय धक्कादायक ठरलं आहे. या वर्षात अनेक दिग्गज कलाकारांनी जगाचा निरोप घेतला आहे. सुप्रसिद्ध गायक वाजिद खान याने देखील 1 जून 2020 रोजी या जगाचा निरोप घेतला आहे.

वाजिद खान याच्या निध.नामुळे संपूर्ण चित्रपट सृष्टी दुःखात बुडाली होती.  चाहत्यांची लाडकी साजिद- वाजिदची जोडी कायमची तुटली होती. वाजिद खानच्या मृ.त्युनंतर त्याची पत्नी कमलारुख खान हिने आपल्या सासऱ्यांवर गंभीर आरोप केले होते.

कमलारुख खान आणि वाजिद खान या दोघांनी आंतरजातीय विवाह केला होता. कमलारुख वेगळ्या धर्माची असल्यानं वाजिदच्या मु.त्युनंतर त्याचे कुटुंब तिच्यावर धर्म परिवर्तन करण्यासाठी दबाव आणत असल्याचा आरोप तिने केला  होता. वाजिदच्या कुटुंबानंतर कमलारुखने एका मुलाखती दरम्यान वाजिद खानवर देखील गंभीर आरोप केले आहेत.

माझा नवरादेखील माझ्यावर धर्म परिवर्तनासाठी दबाव टाकत होता. एवढंच नाही तर त्याने मला घटस्फोट देण्याची धमकीही दिली होती, असा आरोप कमलारुखने एका मुलाखती दरम्यान वाजिद खानवर केला आहे.

तसेच वाजिद आणि मी जवळपास 6 वर्ष एकमेकांपासून लांब राहत होतो. वाजिदने 2014 मध्ये मला घटस्फोट देण्यासाठी अर्ज देखील केला होता पण तो घटस्फोट होऊ शकला नाही, असा देखील खुलासा कमलारुखने या मुलाखतीमध्ये केला आहे.

दरम्यान, कमलारुख खानने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने वाजिद खानच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप केले होते. तिने इन्स्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट लिहित खान कुटुंबियांवर आरोप केले होते.

तिने या पोस्टमध्ये म्हटलं होतं की, मी पारसी होते आणि वाजिद मुस्लीम. आम्ही दोघांनी स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत विवाह केला होता. मात्र, इंटरकास्ट मॅरेज केल्यानंतर एका मुलीला कोणत्या त्रासला सामोरं जावं लागतं याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे.

मी पारसी धर्माची असल्यानं माझ्यासोबत खान कुटुंबात भेदभाव केला जातो. तसेच नेहमी माझ्यावर बंधने लादण्यात आली. हे अतिशय लज्जास्पद असून सर्वांचे डोळे उघडवणारे आहे, असा आरोप कमलारुख हिने खान कुटुंबियांवर केला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

भाजप आमदार गणेश नाईक राष्ट्रवादीत परतणार? गणेश नाईक म्हणाले…

तुम्हालाही कोरोनावरील लस घ्यायची आहे का? जाणून घ्या कसं करायचं लसीसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन?

सोनिया गांधींनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिताच भाजप नेत्यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल!

अंकिता आणि सुशांतचा ब्रेकअप का झाला होता? अंकितानं केला मोठा खुलासा!

‘भाजपमधील 70 टक्के आमदार आमचेच, कोणाला परत घ्यायचं ते…’; छगन भुजबळांचं मोठ वक्तव्य!