फक्त सरपंचच नाही तर मुख्यमंत्रीदेखील जनतेतून पाहिजे; अण्णा हजारेंची मागणी

अहमदनगर | सरपंच निवडीवरून चांगलच राजकारण तापलं आहे. फडणवीसांच्या काळातीस जनतेतून सपरंच निवडण्याचा पद्धतीला महाविकास आघाडीने बदलून पुन्हा ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंच निवडण्याचा निर्णय घेतला. यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

फक्त गावचे सरपंचच नाही तर राज्याचे मुख्यमंत्रीही थेट जनतेतून निवडून दिले पाहिजेत. तेच सत्तेचं खरं विकेंद्रीकरण ठरेल, असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र सरकार ग्रामपंचायत सदस्यांच्या मार्फत सरपंच निवडीचा विचार करीत आहे. पण असं केल्यानं लोकशाहीला धोका निर्माण होऊन हुकूमशाही येण्याची शक्यता आहे. निवडून दिलेल्या सदस्यांनीच सरपंच निवडावा, असंही अण्णांनी सांगितलं आहे.

एकीकडे राज्यपालांनी महाविकास आघाडीनं काढलेला अध्यादेश काढण्यास नकार दिल्यानं सध्या नव्या सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी बारगळली आहे. या पार्श्वभूमीवर सरपंच निवडीची कोणती पद्धत योग्य?, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-‘कर्ज फिटलं साहेब, पोरीच्या लग्नाला या’; अजितदादांचा आपुलकीचा प्रश्न… कुठं दिलं लेकीला?

-अजित पवार यांच्याकडे आणखी एक महत्त्वाची जबाबदारी

-70 वर्ष काय केलं? हा प्रश्न विचारणाऱ्यांना ट्रम्प यांनी भाषणातून उत्तर दिलंय- अशोक चव्हाण

-….म्हणून ट्रम्प यांची मी निंदा करतो; त्यांनी त्वरीत माफी मागावी- जितेंद्र आव्हाड

-डोनाल्ड ट्रम्प आपल्या भाषणात ‘या’ शब्दांचा उच्चार करताना चुकले; सोशल मीडियावर चर्चा