‘एनआरसी’ची अंतिम यादी जाहीर; आसामाच्या मुख्यमंत्र्यांनी जनतेला केलं न घाबरण्याचं आवाहन

गुवाहाटी : आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीची (एनआरसी) अंतिम यादी शनिवारी प्रसिद्ध होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेला न घाबरण्याचे आवाहन केले आहे. जे खरोखरचं भारतीय आहेत त्यांचे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी सरकारकडून आवश्यक ती पावले उचलण्यात येतील आणि गरीबांना कायदेशीर मदतही उपलब्ध करुन दिली जाईल, असे सोनवाल यांनी स्पष्ट केले.

एखाद्याचे नाव एनआरसीच्या अंतीम यादीत नसेल तर तो परदेशी नागरीक असेल असे नव्हे, कारण त्याबाबतचा निर्णय योग्य कायदेशीर प्रक्रियेनंतर परकीय नागरीक लवाद घेऊ शकतो. कोणालाही घाबरण्याची गरज नाही. सरकार प्रत्येकाची काळजी घेण्यासाठी आहे. असं सोनवाल म्हणाले. 

गेल्या वर्षी 30 जुलै रोजी एनआरसी मसुदा प्रसिद्ध करण्यात आला त्यामधून 40.7 लाख लोकांची नावे वगळण्यात आल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. एकूण 3.29 कोटी अर्जदारांपैकी 2.9 कोटी लोकांचाच समावेश करण्यात आला होता.

राज्य पोलीस प्रमुखांनी राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या वेळी कम्युनिटी पोलिसिंगसारख्या कल्पना वापरुन आसाम पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था स्थिती अबाधित ठेवली असल्याचे सांगितले. राज्यभरात विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 23 वर्षांपूर्वी नागरिक समित्या स्थापन करण्यात आल्या, त्याचा वापर एनआरसी यादी तयार करण्याच्या प्रक्रियेच्या वेळी करण्यात आला होता, असं पोलीस महासंचालक कुलधर सैकिया यांनी शुक्रवारी सांगितले. 

महत्वाच्या बातम्या-