नवी दिल्ली | काँग्रेस पक्षाने मोदी सरकारला घेरण्यासाठी आज भारत बचाव आंदोलनाचं आयोजन केलं आहे. हे आंदोलन नवी दिल्लीतील रामलीला मैदानात होणार आहे. या आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित झाले आहे.
आर्थिक मंदी, शेतकरी विरोधी भूमिका, महिला अत्यााचार, बेरोजगारी आणि संविधानावर केलेले हल्ले या मुद्द्यांवर काँग्रेस मोदी सरकारला घेरणार आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधीही या आंदोलनाला उपस्थित राहणार असल्याचं बोललं जात आहे.
भारत बचाओ आंदोलन ऐतिहासिक असेल, असा दावा काँग्रेसने केला आहे. मोदी सरकार खऱ्या मुद्द्यांवरुन देशाचं लक्ष विचलीत करत आहेत. पण आम्ही या सर्व मुद्द्यांवरुन आंदोलन करत जनतेच्या संपर्कात जाणार आहोत, असंही काँग्रेसने सांगितलं आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या भारत बचाओ आंदोलनासाठी उत्तर प्रदेशमधून 40 हजार पेक्षा अधिक कार्यकर्ते दिल्लीत आले आहेत.
‘Bharat Bachao’ is not just a slogan, it is a sentiment of millions of Indians from farmers to Industrialists who are witnessing an unprecedented era of darkness & miseries with every passing day because of Modi Govt’s divisionary policies & dirty tactics.#BharatBachaoRally pic.twitter.com/Pj1Efzm4GL
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) December 14, 2019
महत्त्वाच्या बातम्या-
“शिवसेनेसोबत राजकीय तडजोड करण्यास भाजप तयार” – https://t.co/Kx5uotHckk @ShivSena @ShelarAshish @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 14, 2019
माझ्या पप्पांचा पगार वाढवा; मुख्यमंत्र्यांना चिमुरडीचंं भावनिक पत्र! – https://t.co/gQJyHWTj0h @uddhavthackeray @ShivSena #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 14, 2019
“बाळासाहेबांचे फोटो वापरुनच महाराष्ट्रात भाजप पक्ष टिकला आणि वाढला” – https://t.co/4LKNRcht3H @rautsanjay61 @BJP4India @Dev_Fadnavis @ShivSena
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 14, 2019