‘मुंबईत लोकांचा मृत्यू होतोय आणि इथे आयपीएल खेळवली जातेय’, राखी सावंत भडकली

मुंबई| बाॅलिवूडमधील ड्रामा क्विन आणि वादग्रस्त वक्तव्यांसाठी नेहमी चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे राखी सावंत. ती चाहत्यांच्या मनोरंजनासाठी सोशल मीडियावर काहीना काही पोस्ट शेअर करत असते. अशातच राखी पून्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे.

सध्या राखी काही गोष्टींमुळे चिंतेत असल्याचे दिसून आले आहे. जसे देशभरात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक तुफान वाढत आहे त्यामुळे राखी त्रस्त आहे. त्याचसोबत या परिस्थिती संदर्भात राखीने संताप सुद्धा व्यक्त केला आहे. मुंबईमध्ये कोरोना रूग्णांची वाढलेली संख्या आणि यादरम्यान सुरू असलेले आयपीएलचे सामने यावर राखीने चांगलाच समाचार घेतला आहे.

‘टीव्ही 9’ला दिलेल्या मुलाखतीत राखी सावंतने IPLवर संताप व्यक्त केला आहे. “तू आयपीएलला फॉलो करतेस का?”, असा प्रश्न राखीला विचारण्यात आला. हे ऐकताच राखी संतापली आणि म्हणाली, “कोरोनाचे नियम सर्वसामान्य लोकांसाठी वेगळे आणि क्रिकेटपटूंसाठी वेगळे आहेत का? मुंबईत दररोज कोरोनामुळे लोक मरतायेत आमचं आयुष्य इकडचं तिकडे झालं आहे, आणि हे इथे आयपीएल खेळतं आहे,” राखीच्या या वक्तव्यावर अनेकांनी हे बरोबर असल्याचे म्हटले आहे. तर, या आधी काही सेलिब्रिटींनी देखील आयपीएलवर प्रश्न उपस्थित केले होते.

पुढे राखीने म्हटले की, मी तुम्हाला सांगते की मुंबईत लोक आहेच नाहीत. मुंबईत लॉकडाऊन असल्याने ते सुट्टी घालवण्यासाठी बाहेर गेले आहेत. मी फक्त येथे एकटी आहे. तुम्हाला दुसरं कोणीही मिळणार नाही. कारण सगळेच मुंबई सोडून गेले आहेत. सर्वजण मजा करत आहेत. मालदीव येथे जाऊन तेथील पाण्यात कोरोनाचे विसर्जन करुन येणार आहेत.

काही दिवसांपूर्वी राखी सावंतने आपल्या आईचे फोटो शेअर केले होते आणि प्रियजनांना आईसाठी प्रार्थना करण्यास सांगितले होते. फोटो शेअर करताना राखीने लिहिले होते की, प्लीज, माझ्या आईसाठी प्रार्थना करा, तिच्यावर सध्या कर्करोगाचे उपचार सुरू आहे. सर्वाधिक लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस’ च्या 14 व्या सीझनमध्ये राखी सावंतच्या एन्ट्रीमुळे हा कार्यक्रम बर्‍यापैकी रंजक झाला होता.

दरम्यान, ‘बिग बॉस’ या रिऍलिटी शोमुळे अभिनेत्री राखी सावंत चांगलीच चर्चेत आली. राखी सावंतने या शोमध्ये एक वेगळीच बाजू दाखवली आहे. शोमुळे राखीचं खासगी आयुष्य पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

राखीचं लग्न झालं की नाही झालं यामुळे लोक संभ्रमित आहेत. कधीकधी ती म्हणते की, तिचे लग्न झाले नाही, तर कधी ती लग्न झाले असल्याचेही सांगते. अशातच बॉलीवूड आयटम गर्ल राखी सावंत पुन्हा लग्न करणार असल्याची माहिती तिने स्वतःच काही दिवसांपूर्वी दिली आहे.

अभिनेत्री राखी सावंत कोणत्या अभिनेत्यासोबत नाही तर पुन्हा तिचा नवरा रितेशसोबतच लग्न करणार आहे. राखी म्हणते की रितेशला भारतात येऊन पुन्हा तिच्याशी लग्न करायचे आहे आणि यावेळी तो सर्वांसमोर तिच्यासोबत लग्न करणार असल्याचं, राखी सावंतने सांगितलं.

महत्वाच्या बातम्या – 

जाणून घ्या! कोरोना काळात ‘या’ पदार्थांचे सेवन…

रुग्ण अतिशय गंभीर अवस्थेत असलेली रुग्णवाहिका ट्राफिकमध्ये…

4 वर्षाचा असताना आई गेली अन् वडिलांनी…., अशा प्रकारे…

कौतुकास्पद! कोरोनाकाळात पैसे नसल्याल्यांची ‘ती’…

मास्क नाही घातलं म्हणून पोलिसांनी जोडप्याला आडवलं तर बाई…