सातारा | भारत-चीन मुद्दा हा देशहिताशी संबंधित आहे, हे काही आमच्या घरचं काम नाही. त्यामुळे काँग्रेस या प्रश्नावर जनतेच्या भावना मांडणारच, असं म्हणत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलंय.
आम्ही या प्रश्नी राजकारण करत नसून सक्षम विरोधकाची भूमिका आम्ही पार पाडत असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. ते साताऱ्यामध्ये बोलत होते.
पवारांनी राहुल गांधी यांनी चीनप्रश्नी केलेल्या विविध वक्तव्यांचा समाचार घेत इतिहासाचा अभ्यास करत तसेच माहिती घेत टीका करण्याचं सांगत त्यांना सुनावलं होतं. या पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी पवारांवर टीका केली आहे.
लोकभावना व्यक्त करणं कुणाला चुकीचं वाटत असेल तर ते दुर्दैवी आहे, असं सांगत पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवारांच्या वक्त्तव्यावर आक्षेप घेतलाय.
महत्वाच्या बातम्या-
-राष्ट्रभक्तीचा मक्ता कुणी एका पक्षाने घेतलेला नाही- संजय राऊत
-गोपीचंद पडळकरप्रकरणी उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….
-टिकटॉकवरच्या बंदीनंतर कंपनीची प्रतिक्रीया, म्हणाले…
-अॅपल आणि गुगलचा TikTok ला दणका; घेतला ‘हा’ मोठा निर्णय
-“या युद्धात शरद पवार यांनी एक काडी टाकली अन्…..”