लॉकडाऊन शिथील करायच्या वेळी तुमचा प्लॅन काय असणार? राज ठाकरेंचा सरकारला सवाल

मुंबई |   मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन असूनदेखील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढते आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाबातच्या उपाययोजना तसंच लॉकडाऊनमध्ये सुरू असलेल्या शिथीलतेच्या बाबतीत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. ही बैठक आताच संपली आहे. या बैठकीत राज ठाकरेंनी सरकारला काही महत्त्वाच्या सूचना केल्या. तसंच लॉकडाऊनवर चर्चा करत असताना काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले.

कोरोना आपल्यासोबत आणखी भरपूर दिवस राहणार आहे, हे बऱ्याच तज्ज्ञांनी सांगून झालंय. आपणही लॉकडाऊन खूप काळ ठेऊ शकत नाही. मग सरकार ज्यावेळी लॉकडाऊन शिथील करायचा विचार करेल त्यावेळी तुमचा प्लॅन काय असणार आहे? असा महत्त्वाचा सवाल त्यांनी सर्वपक्षीय बैठकीत सरकारला विचारला. तसंच तुमचा एक्सिट प्लॅन अचानक लोकांना सांगून चालणार नाही. अगोदर काही गोष्टी क्लिअर असायला हव्यात, असंही ते म्हणाले.

कन्टेन्मेंट झोनमध्ये पोलिस फोर्स वाढवा.त्या ठिकाणी एसआरपीएफचे जवान तैनात करा, अशी मागणी त्यांनी केली. एसआरपीएफचे जवान तैनात करा याचा अर्थ पोलिस कमी पडले असा होत नाही. तर ते गेले दोन महिने अहोरात्र मेहनत करत आहेत. म्हणून काही काळ एसआरपीएफचे जवान तैनात करा, असं मी म्हटलं आहे, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

परप्रांतीय ज्यावेळी परत येतील त्यावेळी त्यांची तपासणी करा. कारण ज्यावेळी ते परत येतील तेव्हा त्यांची तपासणी करणं गरजेचं आहे. तसंच त्यांची स्थानिक पोलिस स्थानकात नोंदणी करा. आता हीच वेळी आहे की त्यांची नोंदणी झाली पाहिजे. कारण इतर वेळी ते शक्य होत नाही, असंही राज ठातरे म्हणाले.

दरम्यान, या बैठकीला स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहनमंत्री अनिल परब, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते. तसंच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

-मजुरांचे जथ्येच्या जथ्ये सरकारला अशोभणीय; लॉकडाऊनच्या सरकारी उपाययोजनांवर भुजबळ यांची नाराजी

-दारूच्या 65 कोटी महसुलाच्या बदल्यात 65 हजार कोरोना संक्रमण विकत घेणं परवडणारं नाही- संजय राऊत

-“…तर देशात पुन्हा लॉकडाऊन करावं लागेल”

-अतिश्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीवर 2 टक्के कोरोना कर लावा; देशातल्या विचारवंतांची मागणी

-आजच्या संकटातून मात करण्याची प्रेरणा आपण बुद्धांकडून घेऊ शकतो- मु्ख्यमंत्री उद्धव ठाकरे