नवी दिल्ली | देशातील उद्योगपती आणि बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांच्याशी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संवाद साधला. या चर्चेदरम्यान बजाज यांनी देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनवरही टीका केली. तुम्ही करोनाऐवजी अर्थव्यवस्थेचाच आलेख खाली आणला, असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
भारतानं शेजाऱ्यांकडून शिकण्याऐवजी पाश्चिमात्यांच अनुकरण केलं. त्यांची भौगोलिक स्थिती, अन्य परिस्थिती आणि तापमान यांसारख्या गोष्टी निराळ्या आहे. आपण कठोर लॉकडाउन लागू करण्याचा प्रयत्न केला. परंतु तसं करता आलं नाही. यामुळे मात्र अर्थव्यवस्थेवर मात्र मोठा परिणाम झाला. करोनाच्या आलेखाऐवजी अर्थव्यवस्थेचाच आलेख खाली आला, असं म्हणत बजाज यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
भारताला जपान किंवा स्वीडनप्रमाणे पाऊल उचलणं अपेक्षित होतं. ते हर्ड इम्युनिटीच्या मार्गावर पुढे गेले. याचा अर्थ असा नाही की त्यांनी ज्या लोकांना करोनाचा धोका अधिक होता त्यांना मरण्यासाठी सोडून दिलं. याचा अर्थ असा आहे की सॅनिटायझेशन, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं असा होता. आपल्याकडे दुर्देवानं पूर्ण लॉकडाउन राबवलाच गेला नाही, असं ते म्हणाले.
आपण लागू केला तसा लॉकडाउन जगात कुठेही नव्हता. अशा प्रकारचा लॉकडाउन मी ऐकलाही नव्हता. अन्य देशांमध्ये लोकांना बाहेर पडण्याची आणि जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी तसंच कोणालाही भेटायला जाण्याची परवानगी होती. परंतु आपल्याकडे बाहेर पडणाऱ्यांना पोलिसांकडून मारहण करण्यात आली. त्यांचा अपमान करण्यात आला. इतकंच काय तर ज्येष्ठ नागरिकांनाही सोडलं नाही, असं बजाज म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
-मंत्री अशोक चव्हाण यांची कोरोनावर मात; रूग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
-केरळात गर्भार हत्तीणीचा मृत्यू; भाजप नेत्या मेनका गांधी राहुल गांधींवर संतापल्या
-कोरोनाचा मृत्यूदर कमी करण्यासाठी शासनाने उचललं महत्त्वाचं पाऊल!
-5 अनाथ मुलांना मराठमोळे जिल्हाधिकारी रमेश घोलप यांनी दिला मदतीचा हात
-आनंदाची बातमी… कोरोनाला आपण हरवणारच, राजेश टोपेंची महाराष्ट्राला मोठी गूडन्यूज!