नागपूर : ज्या लोकांना सत्ता दिली, सारं काही दिलं त्यांनी पक्ष सोडल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राग येणं स्वाभाविक आहे, असं रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले म्हणाले आहेत. नाहपूरमधील रविभवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जे पक्ष सोडून जात आहेत त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादीची 25 वर्षे येणार नाही, याबाबत खात्री आहे त्यामुळे ते पवारांना सोडून भाजप, शिवसेनेत जात आहेत, असं प्रतिपादनही रामदास आठवलेंनी केलं आहे.
ईव्हीएमवर निवडणुकीचा निर्णय काँग्रेसच्याच कार्यकाळात झाला आहे. पराभवामुळे विरोधकांनी आता ईव्हीएमला विरोध करत मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याची मागणी केली. मतपत्रिकेवर निवडणूक घेण्यासाठी आम्हीही तयार आहोत. याबाबत आता निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा, असंही रामदास आठवले म्हणाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या पाच वर्षात केलेल्या कामामुळे जनतेने त्यांना मागील निवडणुकीच्या तुलनेत अधिक जागांवर यश मिळवून दिलं आहे, असंही रामदास आठवले म्हणाले आहेत.
विरोधक मोदींच्या मागे लागले होते. आता ते ईव्हीएमच्या मागे लागले आहेत, असा खोचक टोला रामदास आठवलेंनी विरोधकांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या-
विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधीच राष्ट्रवादीचे ‘हे’ सात उमेदवार निश्चित! – https://t.co/bpxHO5N2RC @PawarSpeaks @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 7, 2019
देशातील दिग्गज नेत्यांकडून इस्रोच्या शास्त्रज्ञांच कौतुक – https://t.co/olwfpBcaSn @RahulGandhi @AmitShah @PiyushGoyal @ArvindKejriwal
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 7, 2019
राणे समर्थकांना राडा भोवला; माजी जि. प. अध्यक्षांना सक्तमजुरीची शिक्षा – https://t.co/dIZZ8YmvaV @MeNarayanRane
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 7, 2019