मुंबई | आज सकाळपासून विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात उतरल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
सध्या मतांचं एकंदर गणित बघता शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी होऊ शकतात. मात्र, आमदार रवी राणा यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
शिवसेना एक उमेदवार 100 टक्के पराभूत होणार, असा दावा रवी राणा यांनी केला आहे. त्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीत गुप्त पद्धतीने मतदान होत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राज्यसभेत संजय पवारांना जी मतं मिळाली ती एकनाथ शिंदेंच्या मेहनतीमुळे मिळाली असल्याचं रवी राणा म्हणाले. तर भाजपचे पाचही उमेदवार निवडून येतील असा विश्वास देखील रवी राणा यांनी व्यक्त केला आहे.
एकनाथ शिंदेंना बाजूला ठेवून शिवसेनेनं ज्या पद्धतीनं विधानपरिषद निवडणुकीची आखणी केली. ते पाहता शिवसेनेचा एक उमेदवार 100 टक्के पडणार आहे, असा खळबळजनक दावा रवी राणा यांनी केला आहे.
गेल्या 56 वर्षात जे घडलं नाही असा धक्का शिवसेनेला विधानपरिषदेत बसणार आहे, असं वक्तव्य देखील रवी राणा यांनी केला आहे.
दरम्यान, रवी राणा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे आजच्या निवडणुकीचा काय निकाल लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“आज कुणीही पावसात भिजलं तरी काहीही उपयोग नाही, मविआ निवडणूक हरणारच”
“राजसाहेब लवकरात लवकर बरे व्हा, नाहीतर विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर…”
अग्निवीरांचा कार्यकाळ संपल्यानंतर भाजप देणार नोकरी, ‘या’ नेत्याची मोठी घोषणा
‘त्या मावळ्याचा बळी जाणार’; भाजप नेत्याच्या ट्विटने चर्चांना उधाण
3 आमदारांनी राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढवली?; महत्त्वाची माहिती समोर