बीड : जगमित्र साखर कारखाना जमीन घोटाळा प्रकरणात विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना सर्वोच्च न्यायालयात तूर्तास दिलासा मिळाला आहे. पुढील सुनावणी 21 ऑक्टोबरला होणार असल्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मुंडेंच्या डोक्यावरील टांगती तलवार दूर झाली आहे.
योगायोगाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठी राज्यभरात 21 ऑक्टोबरलाच मतदान होणार आहे. राष्ट्रवादीच्या तिकीटावर धनंजय मुंडे पुन्हा एकदा परळी मतदारसंघातून निवडणुकांच्या मैदानात उतरले आहेत.
बहीण आणि भाजपच्या विद्यमान आमदार पंकजा मुंडे यांच्याविरोधात ते उभे ठाकले आहेत. त्यामुळे एकीकडे राजकीय भवितव्य मतपेटीत बंदिस्त होत असतानाच जगमित्र साखर कारखान्याच्या जमीन घोटाळा झाल्याच्या आरोपातही त्यांचा निकाल येणार आहे.
धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जून महिन्यात दिले होते.
धनंजय मुंडे दोषी असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल का करण्यात आला नाही, अशी विचारणा करत बर्दापूर पोलिस स्टेशनला मुंडेंविरोधात दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते.
महत्वाच्या बातम्या-
…म्हणून चंद्रकांत पाटलांना कोथरुडमध्ये ब्राह्मण महासंघाचा उमेदवारीला विरोध! – https://t.co/kLQhZuT8wh @ChDadaPatil #विधानसभा
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 30, 2019
आशिष शेलारांचं राज ठाकरेंबद्दल सूचक वक्तव्य; म्हणतात…- https://t.co/n2egIQn106 @mnsadhikrut @ShelarAshish
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 30, 2019
घोडगंगा साखर कारखान्याच्या सभेत आजी-माजी आमदारांमध्ये शाब्दिक चकमक – https://t.co/R2wry070hj @BJP4Maharashtra @INCMaharashtra @NCPspeaks #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 30, 2019