मुंबई | दबंग चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनव कश्यपने सुशांत सिंहच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. तसेच सलमान खानवर अनेक गंभीर आरोप केले. यानंतर सुशांत सिंह आणि सलमान खान यांच्या चाहत्यांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरु झालं. आता यावर सलमान खानने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.
माझ्या चाहत्यांनी सुशांत सिंह राजपूतच्या चाहत्यांच्या पाठिशी उभं राहावं. त्यांनी सध्या सुरु असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या भाषेप्रमाणे आणि शिव्याशाप देण्याच्या पद्धतीचा उपयोग करु नये, असं सलमान खानने म्हटलं आहे.
माझ्या चाहत्यांनी सुशांतच्या चाहत्यांच्या भावना समजून घ्याव्यात. आपली प्रिय व्यक्ती गमावणं खूप त्रासदायक असतं. सुशांतच्या कुटुंबीयांनी आणि त्याच्या चाहत्यांनी त्याला गमावलं आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत उभे राहा, त्यांना पाठिंबा द्या, असं सलमान खान म्हणाला आहे.
सुशांत सिंह आणि सलमान खान यांच्या चाहत्यांमध्ये ठिणगी पडली. यावर आता सलमान खानने आपली प्रतिक्रिया देत चाहत्यांना समजूतदारपणे वागण्यास सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-कोरोनामुळे जगाने योगाला पूर्वीपेक्षा अधिक गांभीर्यानं घेतलं- नरेंद्र मोदी
-गुड न्यूज! अखेर कोरोनावर औषध सापडलं, डीजीसीआयकडूनही मिळाली परवानगी
-“…तेव्हा फडणवीसांच्या बंगल्यात थांबून थोरात काय करत होते?”
-“घरात घुसून मारू म्हणत सत्तेत आलेली व्यक्ती म्हणते, घरात कुणी घुसलंच नाही”
-नागपूर महापालिकेच्या सभेत गोंधळ, तुकाराम मुंढे चिडून सभागृहाबाहेर निघून गेले