“…तर देशातील 123 कोटी लोकांचा रक्तगट बदला”

सांगली | समाजात काही कार्यक्रमात खाण्या-पिण्यात अनेकांना विषबाधा होते. या बाधांवर उपाय आहेत. पण देशाला तीन बाधा झाल्याचं शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी सांगितलं.

एक म्लेंच्छ बाधा, दुसरी आंग्ल बाधा आणि तिसरी गांधी बाधा. या तीन बाधांवर तोडगा कोणता असेल तर ते शिवछत्रपती आणि संभाजी महाराज, असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केली आहे.

सांगली जिल्ह्यातील मिरज येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराच्या सुशोभिकरण लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी संभाजी भिडेंनी माध्यमांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलंय.

देशातील सध्याच्या परिस्थितीवर एकमेव तोडगा म्हणजे देशातील सर्व 123 कोटी लोकांचा रक्तगट बदलावा लागेल, असंही संभाजी भिडे म्हणालेत.

सबंध जगाचा त्राता म्हणून ताकद हिंदुस्थानला मिळाली पाहिजे. ती मिळायची असेल, तर एकच उपाय आहे. 123 कोटी लोकांचा रक्तगट  बदला आणि शिवाजी-संभाजीच करायला हवा, असं संभाजी भिडे म्हणालेत.

शिवछत्रपतींना काय प्रिय होतं? मरणाच्या वेळी देखील हा महापुरुष आपलं कुटुंब, लेकीबाळी, सुना-नातवंड यांचा विचार करत नव्हता, असंही भिडे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

रक्त की टोमॅटो सॉस?; सोमय्यांच्या वैद्यकीय तपासणीच्या अहवालातून महत्त्वाची माहिती समोर 

“मी स्वप्नवत नेता आहे, मी काम केलं नाही तर लोक मारतील” 

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज; महत्त्वाची माहिती आली समोर 

“किरीट सोमय्या भाजपचे नाच्या आहेत, आणि देवेंद्र फडणवीस….” 

स्वत:च्याच वरातीत नाचणं नवरदेवाला पडलं महागात, पठ्ठ्या DJ वर नाचत बसला तोवर…