काँग्रेसने देशातील हिंदूंचा अपमान केलाय; भाजपचा हल्लाबोल

नवी दिल्ली |  सत्तेसाठी काँग्रेसला मुस्लिमांचं अधिकच प्रेम आलं आहे. आणि त्या प्रेमातूनच काँग्रेसने देशातील हिंदूंचा वारंवार अपमान केला आहे, अशी जोरदार टीका भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली आहे. दिल्लीतल्या भाजप मुख्यालयात संबित पात्रा यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर तुफान शाब्दिक हल्ला चढवला.

काँग्रेस आता इंडियन नॅशनल काँग्रेस(INC) राहिली नसून ती आता मुस्लिम लिग काँग्रेस(MLC) झाली आहे, असा बोचरा वार पात्रा यांनी काँग्रेसवर केला. समझोता एक्सप्रेस प्रकरणात काँग्रेसने हिंदू दहशतवाद हा शब्दप्रयोग केला. 2006 मध्ये मनमोहन सिंग यांनी देशातील संसाधनांवर पहिला हक्क हा मुस्लिमांचा आहे, असं म्हटलं. 2004 मध्ये सोनिया गांधींनी शंकराचार्यांना अटक करण्याचे आदेश दिले. 1987 मध्ये शहाबानो खटला राजीव गांधींनी पटलून टाकला आणि आता महाराष्ट्राचे मंत्री अशोक चव्हाण यांचं CAA वरचं वक्तव्य आणि मुस्लिमांमुळे आम्ही सत्तेत सहभागी झालो, असं वक्तव्य या आणि अश्या अनेक वक्तव्यांचा दाखला देत या सगळ्या विधानांनी देशातील हिंदूंचा अपमान झाला आहे, असं पात्रा म्हणाले.

दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी देशातील हिंदूंची तातडीने माफी मागावी, असंही पात्रा म्हणाले. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी सोनिया गांधी आणि शरद पवार यांनीही माफी मागावी, अशी म्हटलं.

दरम्यान, भाजपच्या या टीकेला आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी कशा प्रकारे उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-“शिवसैनिकांनो निराश होऊ नका बाळासाहेबांच्या जयंतीला ‘मन से’ सामील व्हा”

-“…म्हणून मुख्यमंत्र्यांनी तुकाराम मुंढेंची बदली केली असावी”

“कितीही विरोध झाला तरी चालेल पण आता माघार नाही”

-मातोश्रीबाहेर आंदोलन करणारा ‘तो’ शेतकरी फडणवीसांच्या भेटीला

-“फक्त झेंड्याचा रंग बदलून चालणार नाही तर मनसैनिकांनी त्यांची मनं देखील बदलली पाहिजेत”