“डोक्यावर बसलाय नरेंद्र आणि डोक्यात गेलाय देवेंद्र”

नाशिक | डोक्यावर बसलाय नरेंद्र आणि डोक्यात गेलाय देवेंद्र… अशी सध्या राज्याची स्थिती आहे, असं म्हणत मनसेचे नेते संदिप देशपांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. 

विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचं मनसेने कधीही घोषित केलेली नाही, उलट सगळ्या जागांवर लढण्यासाठी मनसे तयारी करत आहे. पक्ष जोमाने निवडणुकीच्या तयारीला लागलाय, असंंही संदिप देशपांडेंनी म्हटलं आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी ते नाशिकमध्ये होते. तेव्हा त्यांनी माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपवर टीका केली आहे. 

दरम्यान, कामं केली असतील तर ती लोकांना दिसतील, त्यासाठी जनादेश यात्री काढण्याची गरज का वाटली? असा प्रश्न विचारत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या जनादेश यात्रेवर टीका केली आहे. 

महत्वाच्या बातम्या-