मुंबई | सोनिया गांधींच्या काही समर्थकांकडून राहुल गांधींविरोधात कट-कारस्थान रचलं जातं आहे, असा खलबळजनक गौप्यस्फोट मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम यांनी केला आहे.
आपण सुचवलेल्या नावाचा पक्षाने विचार केला नाही म्हणून संजय निरूपम काँग्रेसवर नाराज आहेत. जर पक्षात अशीच परिस्थिती कायम राहिली तर लवकरच आपण पक्ष सोडू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
दिल्लीत बसलेल्या काँग्रेसच्या लोकांना काँग्रेसमध्ये काय चाललंय याची कल्पना नाही. हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या समर्थांकडून राहुल गांधींविरोधात कट रचला जात असल्याचं निरूपम यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधीचे समर्थक असणाऱ्या लोकांकडे पक्षात दुर्लक्ष केलं जात आहे. त्यांना वेगळं पाडलं जात आहे. असंच सुरू राहिलं तर आपण पक्षात राहण्याबाबत विचार करू, असंही निरूपम यांनी म्हटलं.
विधानसभेच्या निवडणुकीत आपण पक्षाच्या प्रचारापासून लांब राहणार असल्याचंही निरूपम यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, येत्या काही दिवसात आपण काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याचे संकेत निरूपम यांनी दिले आहेत. असं झाल्यास काँग्रेससाठी हा मोठा धक्का असेल.
महत्वाच्या बातम्या-
“नागपूरच्या बाराच्या बारा जागा भाजपच जिंकेल” – https://t.co/BIBmbORfai @Dev_Fadnavis
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) October 4, 2019
भाजपची चौथी यादी जाहीर; या बड्या नेत्यांचा पत्ता कट – https://t.co/MSfru86a0l @bjp4maha @NCPspeaks @INCMaharashtra @Dev_Fadnavis
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) October 4, 2019
बिचुकले आता उदयनराजेंविरूद्ध नाही तर ‘या’ नेत्याविरूद्ध लढणार! – https://t.co/sUSprrk89a @BichukleAbhijit @AUThackeray #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) October 4, 2019