मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवरायांशी तुलना करणं महाराष्ट्रातील भाजपमध्ये गेलेल्या छत्रपतींच्या वंशजांना मान्य आहे का? असा सवाल करत महाराजांच्या वंशजांनी तात्काळ राजीनामे द्यायला पाहिजेत, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांनी रविवारीही अशाच पद्धतीने टीका केली होती.
राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संजय राऊत यांच्या जिभेला लगाम घालायलाही सांगितलं. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा आपल्या वक्तव्याचा पुनरुच्चार करत आपली नेमकी भूमिका स्पष्ट केली आहे.
महाराजांचे वंशज आहात त्याबद्दल आम्हाला आदर आहे. याचा अर्थ तुम्ही भूमिका घेऊ नये असं आहे का? महाराजांची अशा पद्धतीने तुलना केल्याबद्दल तुम्ही तात्काळ राजीनामे द्यायला हवे, असं मत संजय राऊत यावेळी सांगितलं आहे.
महाराजांचे जे वंशज आहेत ते सगळे भाजपमध्ये आहेत. मग कोल्हापूर आणि सातारा या दोन्ही गाद्यांचे जे प्रमुख आहेत त्यांनी सुद्धा शिवाजी महाराजांची जी तुलना केली आहे ती योग्य आहे की नाही याबद्दल भूमिका घ्या, असं म्हटलं तर चिडण्याचं काय कारण, असंही संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत..
महत्वाच्या बातम्या-
अतिउत्साही कार्यकर्त्यांमुळे हा प्रकार घडला असेल; शिवेंद्रराजेंकडून मोदींची पाठराखण – https://t.co/0xEkWy5pyX #shivendrarajebhosale @narendramodi
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) January 13, 2020
राजकीय माकडं सत्ता बदलली की ईमान आणि राजा बदलतात, पण मावळे…- अरविंद जगताप – https://t.co/gN7lhjeAhv @arvindj3 @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) January 13, 2020
“राज ठाकरेंनी पक्षाच्या ध्वजात शिवरायांच्या राजमुद्रेचा वापर करु नये, अन्यथा…” – https://t.co/WYGeT9pPR6 @RajThackeray @mnsadhikrut
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) January 13, 2020