मोठी बातमी! मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू

मुंबई | एकनाथ शिंदेंनी टाकलेल्या बंडाळीच्या ठिणगीचा आता वणवा पेटला आहे. एकनाथ शिंदेंनी समर्थक आमदारांना सोबत घेत बंड पुकारल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्याकडून नाराज एकनाथ शिंदे व शिंदे गटाची मनधरनी करण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी नाही या मागणीवर शिंदे गट ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे.

प्रयत्न करूनही बंडखोर आमदारांची नाराजी दूर होत नसल्याने आता महाविकास आघाडीने कारवाईचा बडगा उचलला आहे. त्यामुळे बंडखोर आमदार व शिवसेना यातील तणाव वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे.

राजकीय हालटालींना वेग आला असून आता शिवसैनिक बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक झाले आहे. शिवसैनिकांकडून बंडखोर आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे.

सध्याच्या घडामोडींवरून तापलेलं राजकीय वातावरण बघता मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मुंबईत 10 जुलैपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.

दरम्यान, सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या अनुषंगाने मुंबईत सर्व अप्पर पोलिस आयुक्त व सर्व पोलिस उप आयुक्तांची बैठक पार पडली. त्यानुसार मुंबईत कलम 144 लागू करण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

उद्धव ठाकरेंना मोठा झटका! शिंदे गटाचं नाव ठरलं?

महाविकास आघाडीची शिवसेना आमदारांवर मोठी कारवाई, एकनाथ शिंदे म्हणतात…

सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदेंची पक्षाच्या नेतेपदावरुन हकालपट्टी होणार?

“तुम्ही आमचे सहा नगरसेवक नेले, शिंदेंनी तुमचे 36 आमदार नेले, आता कसं वाटतंय?”

मोठी बातमी! विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ नॉट रिचेबल