मुंबई : राज्यात कुणाचं सरकार येणार यावरुन गोंधळ सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. यावरुन राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. या भेटीबद्दल शरद पवारांनी गौप्यस्फोट केला आहे.
मोदींसोबत झालेल्या भेटीत काय झालं ते शरद पवारांनी सांगितलं आहे. शेतीची चर्चा झाल्यानंतर मी उठायला निघालो तेव्हा मोदींनी मला थांबवून म्हटलं, आपण एकत्र येऊन काम केलं तर मला आनंद होईल, असा खुलासा शरद पवारांनी केला आहे.
राष्ट्रीय पातळीवर सहकार्य करण्यास तयार आहे. मात्र, राज्यात एकत्र येणं शक्य नाही. या मार्गावरून जाणं मला जमणार नाही, असं उत्तर मी पंतप्रधान मोदींना दिलं, असं पवार यांनी सांगितलं आहे. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
दरम्यान, जनतेने आम्हाला विरोधात बसण्याचा जनादेश दिला आहे हे वारंवार सांगत होतो कारण ती वस्तुस्थिती होती. तसेच मला शिवसेनेलाही ते सूचित करायचे होते. मात्र, शिवसेनेनं भाजपसोबत न जाण्याचा निर्णय घेतल्याने मला भूमिका बदलावी लागली, असं पवार म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
“…तर देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही” – https://t.co/9bAq4aA8bh @Dev_Fadnavis
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 2, 2019
“…तर देवेंद्र फडणवीसांनी केलेलं ते पाप आहे” – https://t.co/rIWNSM3b23 @Awhadspeaks @Dev_Fadnavis @NCPspeaks @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 2, 2019
‘पवार साहेब रोहित दादांना मंत्री करा’; बारामतीत कार्यकर्त्यांची पोस्टरद्वारे मागणी – https://t.co/PWCd7zqM4k @RohitPawarOffic @NCPspeaks @PawarSpeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 2, 2019