रायगड | छत्रपती शिवाजीयांच्या समाधीस्थळी राजकीय घोषणाबाजी केल्याप्रकरणी शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी बुधवारी माफी मागितली आहे. अनंत चतुर्दशीला गोगावलेंनी आपल्या प्रचाराला आरंभ केला होता. यावेळी त्यांनी किल्ले रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. परंतु, यावेळी भरत गोगावले यांच्या काही कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळावर चढून राजकीय घोषणा दिल्या होत्या.
या प्रकरणाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गोगावलेंवर चहुबाजुंनी टीकेची झोड उठली होती. खासदार छत्रपती संभाजी राजे यांनीही या प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. समाधी आणि रायगडाचे पावित्र्य जपणे ही सर्वच राजकीय पक्षांची जबाबदारी आहे, असं त्यांनी म्हटलं होतं.
समाधिस्थळावर चढून घोषणाबाजी करणे योग्य नाही, असं मत संभाजी राजे यांनी व्यक्त केलं होतं. तसेच सोशल मीडियावरूनही अनेकांनी भरत गोगावले यांना ट्रोल केलं होतं.
गेले 4 ते 5 दिवस टीकेचा हा वाढता ओघ पाहून बुधवारी संध्याकाळी भरत गोगावले यांनी जाहीर माफी मागितली. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा अथवा पदाधिकाऱ्यांचा हेतू नव्हता, असं त्यांनी म्हटलं
शिवभक्त म्हणून मी नेहमी रायगडावर जाऊन नतमस्तक होत असतो. उत्साहाच्या भरात कार्यकर्त्यांकडून राजकीय घोषणा दिल्या गेल्या. झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, असे गोगावले यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
शेतकरी पिशवीत कांदा आणतील म्हणून मोदींच्या सभेत पिशव्यांनाच बंदी!https://t.co/debvdAh7Lr @narendramodi @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 19, 2019
युतीबद्दल बोलण्याचा कुणालाही अधिकार नाही- गिरीश महाजन https://t.co/HsWpjR1aIv @girishdmahajan @DRaote
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 19, 2019
महाराष्ट्राच्या भूमीत जलीलगिरीस थारा मिळणार नाही; उद्धव ठाकरे आक्रमक https://t.co/uKdBe2rW5R @uddhavthackeray @OfficeofUT @imtiaz_jaleel
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 19, 2019