“भाजप हिंदू-मुसलमान, पाकिस्तान वर बोंबलत बसले पण शेवटी विजय केजरीवाल यांच्या ‘आप’चाच झाला”

मुंबई | दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’चा दणदणीत विजय झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आजच्या सामना अग्रलेखातून भाजपवर टीका तर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं कौतुक केलं आहे. भाजप हिंदू-मुसलमान, पाकिस्तान वगैरे बोंबलत बसले. पण शेवटी विजय केजरीवाल यांच्या ‘आप’चा झाला. ‘आपमतलब्यां’चा पराभव झाला. केजरीवाल यांच्या झाडूने सगळय़ांना साफ केले. केजरीवाल यांचे अभिनंदन!, असं शिवसेनेनं अग्रलेखात म्हटलं आहे.

झारखंडमध्ये पराभव झाला व ध्यानीमनी नसताना महाराष्ट्रासारखे महत्त्वाचे राज्य हातचे गेले. देशाच्या राजधानीवर ‘आप’चा झेंडा फडकला, तर आर्थिक राजधानीवर शिवसेनेचा मुख्यमंत्री राज्य करीत आहे. हा बाण भाजपच्या काळजात आरपार खुपणारा आहे. लोकसभा निवडणुकीतील मोठय़ा विजयानंतर भाजपला एकापाठोपाठ एक राज्ये गमवावी लागली आहेत, असं अग्रलेखात म्हणण्यात आलं आहे.

विधानसभा निवडणुकीत एकीकडे राज्यांतील तगडे नेतृत्व आणि त्यांच्यासमोर मोदी आणि शहांची ‘हवाबाज’ नीती फोल असे चित्र निर्माण झाले आहे. दिल्ली विधानसभेचा निकाल पाहिला तर एकटे केजरीवाल हे संपूर्ण केंद्र सरकार व शक्तिमान भाजपला भारी पडले आहेत, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

केजरीवाल यांच्या पराभवासाठी भाजपने देशभरातील अडीचशे खासदार, दोन-चारशे आमदार, मुख्यमंत्री तसेच राज्यांचे मंत्री व संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ मैदानात उतरवले होते, पण त्या सर्व फौजांचे शेवटी दिल्लीच्या मैदानावर साफ पानिपत झाले. अहंकार, मस्तवालपणा आणि ‘हम करे सो कायदा’ या वृत्तीचा हा पराभव आहे, असं म्हणत शिवसेनेनं भाजपवर टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-कारखान्यातल्या 100 कर्मचाऱ्यांच्या वापर करुन केलं पैशांचं वाटप; रोहित पवार अडचणीत

-दिल्लीच्या निकालावर मोदींचं ट्वीट… केजरीवालांचं लगोलग उत्तर!

-‘फॅसिजमचा शत्रू तो आपला मित्र’… आव्हाडांनी खास शैलीत केलं केजरीवालांचं अभिनंदन!

-….असा राजा आहे ज्याच्याकडे ‘राजधानी’च नाही; चाकणकरांनी उडवली मोदींची खिल्ली

-दिल्लीच्या तख्तावर पुन्हा केजरीवाल बसल्यानंतर मोदी ट्वीट करून म्हणाले….