“स्वबळावर लढलो असतो तर 100 जागा जिंकल्या असत्या”

मुंबई | शिवसेनेबरोबर युती केली नसती तर आम्ही सत्तेवर आलो असतो, अशी भावना राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत बोलताना व्यक्त केली होती. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

शिवसेना स्वबळावर लढली असती तर 100 पेक्षा जास्त जागा जिंकली असती, असा टोला राऊतांनी लगावला आहे. तसेच आता जर तरची भाषा करण्यास काही अर्थ नाही. देवेंद्र फडणवीस आता विरोधी पक्षनेते आहेत, असं ते म्हणाले आहेत.

आता कोणी कोणासाठी दरवाजे उघडे ठेवून बसू नये. आता एकत्र येण्याची वेळ निघून गेली आहे. आतापर्यंत अनेक उत्तम विरोधीपक्षनेते झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेता म्हणून उत्तम काम करुन दाखवावं, असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेसाठी आजही भाजपचे दरवाजे खुले असल्याचं म्हटलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-