मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलं आहे. सहकारी बँकांना वाचवण्याची विनंती पवारांनी नरेंद्र मोदींना केली आहे.
सहकारी बँकांचं सहकारपण कायम ठेवलं पाहिजे. असं झालं तरच या बँका शेतकरी आणि ग्रामीण मजूर तसंच शेतीच्या कामासाठी मदत करण्याच्या आपल्या हेतूमध्ये यशस्वी होतील, असं शरद पवार यांनी पत्रात नमूद केलं आहे.
सहकारी बँकांना आर्थिक शिस्त लागावी याच्याशी आपण सहमत आहोत. परंतू सहकारी बँकांना खासगी बँकांमध्ये बदलून पैशांचा गैरव्यवहार त्वरित थांबेल असं म्हणणं चुकीचं ठरेल, असंही पवारांनी म्हटलं आहे.
दरम्यान, 2019-20 मध्ये आर्थिक सहकारी बँकांमध्ये गैरव्यवहार कमी झाले असल्याचा दावा करत रिझर्व्ह बँकेची आकडेवारी दाखवत केला आहे. सहकारी बँकामध्ये आर्थिक शिस्त आणण्याचीही गरज असल्याचे म्हटलं जातं. मात्र सहकारी बँकांना खासगी बँकेत रुपांतरीत केल्यास आर्थिक अनियमितता आणि घोटाळे होण्याची भीतीही शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.
I have written a letter to Hon. @PMOIndia Shri @narendramodi to express my deep concern about the preservation of the ‘Co-operative’ character of Co-operative banks having legacy of more than 100 years. pic.twitter.com/CZ6IBu4kZ1
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 18, 2020
महत्वाच्या बातम्या-
आई टोपली विणायची अन् बाप दारू प्यायचा, मात्र अखेर जिद्दीने ‘तो’ कलेक्टर झाला
…तर महाविकास आघाडीने सत्ता भाजपकडे सुपूर्द करावी- सुजय विखे पाटील
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने महाराष्ट्रतील या जिल्ह्यातील ‘ही’ दोन गावं घेतली दत्तक!
अजित पवारांची ‘ही’ स्टाईल मला भावते- रोहित पवार
सुशांतच्या बेडरूमच्या दरवाज्याचा टाळा तोडणाऱ्याने सांगितलं त्यावेळचं खरं वास्तव; टाळा फोडला तेव्हा…