“महाराष्ट्र दिल्लीसमोर मोडेल पण वाकणार नाही”

मुंबई | मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या अटकेनंतर राज्यातील राजकारण  ढवळून निघालंय. यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना काही थेट सवाल केले आहेत. अमित शहांना माझे दोन प्रश्न आहेत, विरोधात असले की ईडी लावता आणि तुमच्या पक्षात आले की ईडी गायब होते तुम्ही कोणते औषध वापरता ते सांगा, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी शहा यांना सवाल केले आहेत.

ईडीचा पेपर फुटतो त्यांच्यावर कारवाई का होत नाही? महाराष्ट्र खूप अडचणीच्या काळात चालला आहे. दिल्लीची माणसं महाराष्ट्राचा अपमान करत आहेत. पण दिल्लीसमोर मोडेल पण वाकणार नाही, असं सुप्रिया सुळे यांनी ठणकावलं आहे.

तसेच लढेंगे जरुर जितेंगे जरुर.आपल्याला ईडीची नोटीस आली की राज्यात आपले सरकार येते. पहिली नोटीस आली तेव्हा महाराष्ट्रात सरकार आले, झेडपीत आम्ही त्यांना झिरोवर आणणार आहे, असं ते म्हणालेत.

काही लोकांना त्यांची जागा दाखवावी लागते. असेही त्या म्हणाल्या. भाजपला उद्देशून बोलताना, आम्ही तुमच्यामागे ईडी वगैरे लावणार नाही. तिसरी नोटीस आली की देशात सत्ता येईल. असा इशाराही त्यांनी दिला आहे.

देशामध्ये कोणीही आरोप केले तेव्हा इंदापूरमधील जनता साहेबांसोबत राहिली, अजितदादा आले की टॉनिक आणि साहेब आले की चव्यनप्राश मिळते असंही त्या म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या-

सरकारची भन्नाट योजना; एकाचवेळी मिळतील 10 लाख 

“येत्या काही दिवसांत मोठा खुलासा करणार”, फडणवीसांच्या दाव्यानं राजकारणात खळबळ 

माजिद मेमन यांचा फडणवीसांवर गंभीर आरोप, म्हणाले “नवाब मलिक यांना…”

“आता ईडीसमोर बोल नाहीतर तुझ्या हातात विडी देतील”

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! सिलेंडर, सीएनजीसह वीज देखील महागण्याची शक्यता