बाळासाहेबांचे विचार अजूनही जिवंत आहेत- सुप्रिया सुळे

मुंबई : कोहिनूर स्क्वेअर प्रकरणात राज ठाकरे यांची ईडी चौकशी म्हणजे राजकीय दबाव तंत्र आहे. जो कोणी आवाज उचलतो त्याचा आवाज दडपण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. तसंच ईडी चौकशीसाठी कुटुंबासहीत जाणाऱ्या राज ठाकरे यांच्यावर किंवा त्यांच्या कुटुंबीयांवर कोणीही टीका करण्याची गरज नाही, असंही मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

अशा कठिण प्रसंगी कोणाच्याही मागं त्यांच्या कुटुंबातील सदस्य उभे राहतात. त्यामुळं राज ठाकरे यांच्यासोबत कुणी गेलं तर त्यावर टीका करू नये, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटल आहे.

बाळासाहेबांचे संस्कार अजूनही जिवंत आहेत. यामुळेच उद्धव ठाकरे यांनी भाऊ राज ठाकरेंची बाजू घेतली,  असंही सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेवर बोलताना राज ठाकरेंच्या पारड्यात आपली सहानुभूती टाकली आहे.

कोहिनूर मिल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची ईडी कार्यालयात चौकशी सुरु झालीय. राज ठाकरेंना ईडीकडून आज चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.

राज ठाकरेंच्या चौकशीतून काहीही निष्पण्ण होईल असं वाटत नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती.

राज यांच्यासोबत पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित, मुलगी शर्मिला आणि सून मिताली असा सगळा परिवार उपस्थित आहे. राज ठाकरे यांना एकट्याला ईडी ऑफिसमध्ये प्रवेश देण्यात आला. त्यानंतर ईडीच्या कार्यालयाचे दरवाजे बंद करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या-

-“राजकारण बाजूला, कुटुंब म्हणून आम्ही राज ठाकरेंच्या पाठिशी”

-मी नक्की कुठे??? निर्णय येत्या 10 दिवसात- नारायण राणे

-कसोटीला मालिकेला आजपासून सुरूवात; सलामीला कोण?

-औरंगाबादमध्ये काँग्रेसला धक्का; विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेचे अंबादास दानवे विजयी!

-राज ठाकरे कुटुंबासह ईडी कार्यालयाकडे रवाना