नाशिक | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी गेल्या काही दिवसांपासून दुध दरवाढीसाठी राज्यात आंदोलनं सुरु केली आहेत. मात्र, अद्याप स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या या मागणीवर राज्य सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. हीच खंत व्यक्त करताना राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
एक बॉलीवूड अभिनेता ज्याने गांजा घेतल्याचं म्हटलं जात आहे. त्या अभिनेत्याची चर्चा होत आहे. मात्र एक सामान्य शेतकरी ज्याने राज्य सरकारनं दुधाला भाव दिला नाही या कारणावरून आपले प्राण दिले. त्या रेवणनाथ काळेच्या मृत्यूबद्दल कोणीच चर्चा करत नाही, अशी खंत राजू शेट्टी यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे.
नुकतंच राजू शेट्टी यांनी दुध दरवाढीसाठी बारामती शहरात मोर्चा काढला होता. यावेळी राजू शेट्टी यांचे अनेक समर्थक राज्य सरकारविरोधात रस्त्यावर उतरले होते. विनापरववाना मोर्चा काढल्यामुळे राजू शेट्टींसह 40 आंदोलकांवर बारामतीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामती पोलिसांनी दाखलं केलेल्या या गुन्ह्यावरही राजू शेट्टी यांनी भाष्य केलं आहे.
आमच्यावर गुन्हे दाखल होणं ही बाब आमच्यासाठी नवीन नाही. दुध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून काढलेला मोर्चा हा आमच्या गुन्ह्यांमध्ये झालेली आणखी एक भर. मात्र तुम्ही कितीही गुन्हे दाखल करा आम्ही आंदोलने करत राहणार, असंही राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितलं आहे.
मी गाईचा छळ केला असा गुन्हा माझ्यावर दाखल केलाय. दुधाला दरवाढ मिळावा म्हणून आम्ही आंदोलनं करतोय आम्ही कसा गाईचा छळ करू शकतो. मात्र, गुन्हा दाखल झाला तरी होऊद्या आम्ही मात्र आंदोलंनं सुरूच ठेवणार, असंही राजू शेट्टी यांनी म्हटल आहे.
दरम्यान, राज्य सरकारनं 6 एप्रिल पूर्वीचं दुध संकलन आणि नंतरच संकलन याच ऑडीट करावं. उत्पादकांच्या नावावर सरकारचा दुध केंद्रावरील डल्ला लक्षात येईल, असा आरोपही राजू शेट्टी यांनी यावेळी केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
सुशांत प्रकरणी आदित्य ठाकरेंच नाव भाजपच्या कोणत्याही नेत्यानं घेतलेलं नाही- देवेंद्र फडणवीस
‘मला सुशांतकडून बाळं हवं होतं जे…’; रियाने सुशांतचा आणि तिच्या आई होण्याबाबत केला मोठा खुलासा!
‘मी आणि सुशांत एकत्र होतो तोपर्यंत केव्हाच…’; रियाचा ‘तो’ दावा अंकिताने खोडला