कसोटी इतिहासात किंग कोहलीचा ‘विराट’ विक्रम

किंग्स्टन : भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडीज विरुद्ध सबिना पार्क, किंग्स्टन येथे पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 257 धावांनी विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारताचा कर्णधार विराट कोहलीने मोठा इतिहास रचला आहे.

विराट भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार ठरला आहे. त्याने भारताचा कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी विजय मिळवण्याच्या एमएस धोनीच्या विक्रमाला मागे टाकले आहे.

सोमवारी मिळवलेला विजय विराटचा कसोटी कर्णधार म्हणून 28 वा विजय ठरला आहे. त्यामुळे त्याने भारताचा माजी कर्णधार धोनीच्या 27 कसोटी विजयांच्या विक्रमाला मागं टाकलं आहे.

विराटने कसोटीमध्ये आतापर्यंत 48 सामन्यात भारताचं नतृत्व केलं आहे. यामध्ये त्याने 28 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 10 सामन्यात पराभव स्विकारला आहे. त्याचबरोबर 10 सामने अनिर्णित राहिले आहेत.

भारताकडून सर्वाधिक कसोटी विजय मिळवण्याच्या यादीत विराट आणि धोनी पाठोपाठ सौरव गांगुली असून त्याने 21 विजय मिळवले आहेत.

कसोटीत सर्वाधिक विजय मिळवणारे भारतीय कर्णधार –

28 – विराट कोहली (48 सामने)

27 – एमएस धोनी (60 सामने)

21 – सौरव गांगुली (49 सामने)

14 – मोहम्मद अझरुद्दीन (47 सामने) 

9 – सुनील गावस्कर (47 सामने)

9 – मन्सुर अली पतौडी (40 सामने)

महत्वाच्या बातम्या-