बॉलीवूड मधून अचानक गायब झालेल्या ‘या’ बड्या अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली त्यावेळी माझ्यासोबत…

मुंबई | चित्रपट सृष्टीला एक मायानगरी म्हटले जाते. रोज कित्येक लोक या मायानगरीत आपलं नशीब आजमवण्यासाठी येतात. मात्र, यातील सर्वांनाच यश मिळतं असं नाही. इंडस्ट्रीत येणारे खूप कमी कलाकार आपलं स्वप्न पूर्ण करू शकतात. चित्रपट सृष्टीत प्रवेश केल्यानंतर खूप कमी लोकांना लवकर यश मिळतं तर बऱ्याच कलाकारांना कित्येक वर्ष मेहनत करून देखील यश मिळत नाही.

आज इंडस्ट्रीत खूप कमी कलाकार असे आहेत ज्यांना त्यांच्या पहिल्याच चित्रपटात यश मिळाले असेल. अशाच मोजक्या कलाकारांच्या यादीत एक नाव येतं ते म्हणजे अभिनेत्री महिमा चौधरी हिचं.

महिमा चौधरी हिच्या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं होतं. 1997 मध्ये महिमाने ‘परदेस’ या चित्रपटातून बॉलीवूड इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. या चित्रपटातला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. मात्र, महिमाचे हे यश जास्त काळ टिकू शकलं नाही.

महिमाला या इंडस्ट्रीत जेवढ्या लवकर यश मिळालं होतं. तेवढ्याच लवकर महिमा या चित्रपट सृष्टीला सोडून देखील गेली होती. महिमा बॉलीवूड मधून अचानक गायब झाल्यानं यामागे अनेक कारणे सांगण्यात आली होती. मात्र, आता महिमाने स्वतः एका मुलाखती दरम्यान चित्रपट सृष्टी सोडण्यामागचं खरं कारण सांगितलं आहे.

महिमा म्हणाली की, मी अचानक बॉलीवूड इंडस्ट्रीतून गायब झाली नव्हती. मी बॉलीवूड सोडले नव्हते तर मला बॉलीवूड सोडावे लागले होते. यामागे खूप मोठे कारण होते.

1999 मध्ये मी ‘दिल क्या करे’ या चित्रपटाची शूटिंग करत होते. चित्रपटाच्या शूटिंगसाठी मी हॉटेलवरून सेटवर चालले होते. यावेळी एका ट्रकने अचानक पाठीमागून माझ्या कारला धडक दिली आणि मी अपघातात गंभीर जखमी झाले. यावेळी मला काही अनोळखी लोकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले,  असा खुलासा महिमाने केला आहे.

तसेच यानंतर माझ्या चेहऱ्यावर एक ट्रीटमेंट करण्यात आली होती. माझ्या चेहऱ्यावरून तब्बल 68 काचेचे तुकडे काढण्यात आले होते. यावेळी मी माझा स्वतःचा चेहरा आरशात पाहू शकत नव्हते. माझ्या चेहऱ्यावर खूप गंभीर दुखापत झाली होती, असं महिमाने यावेळी म्हटलं आहे.

पुढे महिमा म्हणाली की, यानंतर मला भीती वाटत होती की माझा चेहरा पाहून मला इंडस्ट्रीत काम मिळणार नाही. म्हणून मी इंडस्ट्री सोडून लांब गेले आणि स्वतःला वेळ दिला. पण ही माझी चूक ठरली आणि माझे करिअर खराब झाले. मी ज्यावेळी ट्रीटमेंट घेवून पुन्हा आले तेव्हा मला लोक विसरले होते. मला इंडस्ट्रीत काम देखील मिळत नव्हते.

यानंतर 2005 मध्ये महिमा चौधरीने लग्न केलं आणि आपल्या वैवाहिक आयुष्यामुळे पुन्हा इंडस्ट्रीपासून लांब राहिली. मात्र, महिमाने आता मुलाखती दरम्यान चित्रपट सृष्टीत कॅमबॅक करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे.  ती म्हणाली की, मला जर पुन्हा संधी मिळाली तर मी नक्कीच बॉलीवूड इंडस्ट्रीत पुन्हा येईल.

महत्त्वाच्या बातम्या-

अर्णव गोस्वामींचं थेट मुख्यमंत्र्यांना आवाहन! म्हणाले खेळ तर आत्ता सुरु झालाय….

कंगनानं उलघडलं बॉलीवूडचं ‘ते’ काळं सत्य, सरकार सोबत अभिनेत्यांच्या बायकांवर गंभीर आरोप करत म्हणाली…

व्हायरल होणाऱ्या ‘त्या’ फोटोमागचं सत्य सांगत शरद पवारांचा राज्यपालांवर निशाणा

मोठी बातमी! अर्णव गोस्वामींचा अखेर अंतरिम जामीन मंजूर

मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबद्दल किरीट सोमय्या यांचा धक्कादायक गौप्यस्फोट! म्हणाले रश्मी ठाकरे यांनी नाईकांची जमीन घेत…