सर्वात मोठी बातमी! राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार?; अत्यंत महत्त्वाची माहिती समोर

मुंबई | राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडल्यास राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता आहे. आमदारांच्या कार्यालय आणि घरांवर हल्ले होत आहेत. जर असं चित्र कायम राहिलं तर राष्ट्रपती राजवट लावण्याचा राज्यपाल विचार करु शकतात अशी माहिती आहे

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात नवा भूकंप आला आहे. महाविकासआघाडी सरकार कोसळण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास 50 आमदारांची संख्या आहे. त्यामुळे महाविकासआघाडी सरकार धोक्यात आलं आहे.

एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात याबाबत राज्याच्या राजकारणाची पुढची दिशा ठरणार आहे. त्यातच आता राष्ट्रपती राजवटीची शक्यता वर्तवली जात आहे.

बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. त्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली जात आहे. अनेक ठिकाणी आमदारांचे बॅनरजी फाडण्यात आली आहेत. तर काही ठिकाणी त्यांच्या फोटोला काळीमा फासण्यात आलं आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी गुजरातमध्ये देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती आहे. काल रात्री ही भेट झाली. याबाबत कमालीची गुप्तता पाळली गेली.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘…पण त्यांनी आता शिवसेनेच्या आईवरच हात घातला’, किशोरी पेडणेकरांचा घणाघात 

“कुठलाही गद्दार बाळासाहेबांचं नाव वापरू शकत नाही, मतं मागायचीच असतील तर…”

मोठी बातमी! मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू

उद्धव ठाकरेंना मोठा झटका! शिंदे गटाचं नाव ठरलं?

महाविकास आघाडीची शिवसेना आमदारांवर मोठी कारवाई, एकनाथ शिंदे म्हणतात…