जन्माला येणारा प्रत्येकजण ‘माणूस’ म्हणून ओळखला जातो. पण ज्यांच्यात खरंच माणुसकी जिवंत आहे, त्यांनाच माणूस म्हणता येईल. आता माणुसकी मोजण्याचे कोणतेही माप नाही.
हेच नेमकं कारण आहे की, आपण नेहमी चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करतो. कारण इथे जे दिसतं, त्यावर लोकं विश्वास ठेवतात. लोक या दिखाव्याला चांगलं म्हणतीलही, पण हा निर्णय सर्वस्वी आपला आहे की आपल्यात माणुसकी आहे की नाही.
आपल्या जिवनात रोज छोट्या-मोठ्या घटना घडत असतात. त्या छोट्या घटनाच ठरवतात की, आपल्यातला माणूस जिवंत आहे की असंवेदनशीलतेने त्याला नष्ट करून टाकले. तुम्ही या गोष्टी काळजीपूर्वक वाचून स्वतःच ठरवा, तुमच्यात माणुसकी जिवंत आहे की तुम्हाला ती जिवंत करण्याची गरज आहे.
१. मदत करण्याची वृत्ती – माणुसकीच्या नियमात पहिला गुण हा मदतीचा मानला जातो. कोणालाही मदत केली की त्याचा आत्मविश्वास अजून मजबूत होण्यास मदत होते. आता कोणत्या भीक मागणाऱ्या व्यक्तीला पाच-दहा रुपये दिले की आपण मदत केली असं मानतो, पण तसं नाही.
ज्या व्यक्तीच्या स्वभावातच मदत करण्याची वृत्ती असते त्यांना याचीही जाणीव नसते की आपण किती मोठी मदत केली आहे. बस, ट्रेन किंवा अन्य ठिकाणी जागेवर बसण्यावरून नेहमी भांडण होते. मात्र, काही माणसं अशी असतात की एखाद्या गरजूला पाहून स्वतःच्या जागेवरून उठून जातात आणि त्या बदल्यात पुढचा माणूस आभार मानेन, याचीही अपेक्षा ठेवत नाही. जर तुमच्यात निस्वार्थी मदत करण्याची वृत्ती असेल तर तुमच्यातील माणुसकी जिवंत आहे, असं समजून घ्या.
२. महिलांना अस्वस्थ होऊ देऊ नका – आपल्या मुलाच्या काळजीत आई इतकी व्यस्त असते की, तिला बऱ्याच नजरा पाहत असतात, याची जाणीव नसते. सार्वजनिक ठिकाणी किंवा इतरत्र महिला जेव्हा काही कारणास्तव खाली वाकतात, तेव्हा त्यांचे स्तन दिसतात.
अशी परिस्थिती तुमच्यासमोर जर कधी आली असेल तर तुम्ही तुमचा चेहरा दुसरीकडे वळवून त्या महिलेला अस्वस्थ होण्यापासून वाचवत असाल तर तुमच्यातील माणसाची ती ओळख आहे. मात्र, बहुतेक लोक ती संधी म्हणून त्यांच्याकडे एकटक पाहत राहतात. हे पाहणारे लोक त्या महिलेलाच दोष देतात, पण विचार केला तर ही एक सामन्यच गोष्ट आहे. याचा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे.
३. कोणाचाही वाईट विचार करू नये – आजच्या काळात धोका देणे ही गोष्ट सामान्य झाली आहे. कुणी आपल्याला धोका दिला तर मनात बदल्याची भावना ठेवतात. पण बदल्याची भावना ही चुकीची असते. मात्र, काही माणसं अशीही असतात की, त्यांच कुणी वाईट केलं तरी ते त्या माणसाबद्दल मनात बदल्याची भावना ठेवत नाही. ते हा निर्णय देवावर आणि वेळेवर सोडून देतात. जर तुम्हालाही अशीच सवय असेल तर याचे सर्व श्रेय तुमच्यातील माणुसकीला जाते.
४. मदत केल्यावर दुःखी होऊ नये – मी बस स्थानकाजवळ उभा होतो. तिथे एक आजी आल्या आणि म्हणाल्या की मला भूक लागली आहे, काहीतरी खायला द्या. त्यांच्याकडे पाहून बऱ्याच दिवसांपासून त्यांनी काही खालले नसेल असं वाटतं होते. मग मी माझ्या खिशात हात घातला आणि जेवढे पैसे काढले तेवढे देऊन टाकले. हे पाहून त्यांना खूपच आनंद झाला. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मला समाधान वाटले. मात्र, नंतर मला समजले की, माझ्याकडे बसने जाण्यासाठी तिकिटाचे पैसेही नाही. तेव्हा दुःखी होऊन मी पैसे का दिले हा विचार करू नये. जर तुम्ही असा विचार करत नसाल तर तुमच्यातील माणुसकी सुरक्षित आहे.
५. इतरांच्या आनंदाची काळजी घेणे – काही माणसं स्वतःच्या आनंदानंतर इतरांच्या आनंदाचा विचार करतात. पण काही माणसे अशीही असतात, जे स्वतःपेक्षा इतरांचा आनंद पाहून जास्त आनंदी होतात. यासाठी त्यांना स्वतःची कोणती इच्छा दडपावी लागली तरी त्यांना त्याचे दुःख होत नाही. काही वेळा काही रुपयांमध्ये जी गोष्ट मिळत नाही, ती पुढच्या व्यक्तीच्या हास्याने मिळते. जर तुम्हाला अशी सवय असेल तर ती कायम तशीच ठेवा.
६. प्राण्यांसाठी संवेदनशील असणे – ज्या व्यक्तीत संवेदना असतात त्याला इतरांचे दुःख समजते. पण हा भाव खूपच कमी माणसांमध्ये असतो. काही माणसांना प्राण्यांच्याही वेदना समजतात. ही गोष्ट फक्त त्यांच्यासाठी नाही जे फक्त आपल्या पाळीव प्राण्यांप्रत अशी भावना ठेवतात. जो माणूस कोणत्याही प्राण्याला तडपताना पाहून त्यांना मदत करतात, त्यांच्यात खरी माणुसकी जिवंत आहे.
७. रक्तदानापेक्षा मोठे कोणते दान नाही – जेव्हा आपलं कोणी जवळच असेल तेव्हा लोक रक्त देण्यासाठी आणि मागण्यासाठी तयार असतात. पण अनेकजण रक्तदान करायचे म्हटले तर बरेचजण कारणे सांगतात. रक्तदान केल्यामुळे आपण कितीतरी व्यक्तींचा जीव वाचवू शकतो. यामुळे तुमची तिजोरी आशिर्वादाने भरलेली असेल. जर तुम्ही नियमितपणे रक्तदान करत असाल तर तुम्ही अनेकांचा जीव वाचवण्यासोबत तुमच्यातील माणूस जिवंत आहे, याची जाणीव करून देत आहात.
८. मुलांना पाहून आनंदी होणे – अनेक माणस म्हणतात की, मुले त्यांना खूप आवडतात. पण त्यांनी मुलांच्या त्रासामुळे ते अनेकदा कंटाळून जातात. मुलांचे सौंदर्य हे त्यांच्या त्रासातच असते. काही माणसं मुलांचा त्रास पाहून त्यांना ओरडत नाही तर त्या क्षणाचा ते आनंद घेतात, त्यांच्याबरोबर खेळतात आणि त्यांना आनंदी ठेवतात.
९. मृत शरीर पाहिल्यावर डोकं झुकवणे – कोणताही माणूस हे जग सोडून जातो तेव्हा सोबत काहीही घेऊन जात नाही. त्यांचे मित्र आणि शत्रू हे सर्व त्या माणसाच्या शरीरासोबत माती होऊन जाते. पण असे काही लोक असतात, जे एखादा व्यक्ती गेल्यानंतरही त्याच्याबद्दल वाईट बोलतात. कोणताही धर्म आणि माणुसकी हेच शिकवते की, शत्रुचाही मृ.त्यु झाल्यावर त्याच्यासाठी प्रार्थना करून त्यांच्या मृ.तदेहासमोर डोकं टेकवणे.
वरती लिहिलेल्या गोष्टी जर तुमच्या स्वभावाशी मिळत असतील तर तुमच्यात माणुसकी जिवंत आहे. ती कायम तशीच ठेवा. जर काही कमी वाटत असेल तर ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. कारण संपूर्ण जगात शांतता प्रस्थापित करायची असेल तर माणूस आणि माणुसकी जिवंत असणे फार महत्त्वाचे आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
महेंद्रसिंग धोनीनं स्वतःच्याच नकळत आयपीएलमध्ये रचला नवीन विक्रम!
अखेर एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित; राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्यानं दिली माहिती
भाजपला मोठा धक्का! पक्षांतरापूर्वीच खडसेंनी मोदींविरुध्द टाकलं पहिलं पाऊल
सुशांत प्रकरणी डाव फिरला! आता एनसीबी विरोधातच ‘या’ प्रकरणी गु.न्हा दाखल