‘माझ्याच लोकांना मी नको असेल तर मग काय करायचं’; उद्धव ठाकरे भावूक

मुंबई | काँग्रेस तसेच राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे नकोत असं म्हटलं तर हरकत नाही. मात्र माझ्या लोकांनी असं म्हणणं हे माझ्यासाठी खेदजनक असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.

माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री पदावर नको असेल तर मी का राहू? माझ्याशी थेट का बोलत नाही? सुरतला जाण्याची काय गरज, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे.

मी शिवसेना प्रमुखपदही सोडेन. पण समोर येऊन सांगायला हवं. मी मुख्यमंत्रीपद आणि शिवसेना प्रमुखपद सोडेन. मी मुख्यमंत्रीपद सोडून पुन्हा शिवसेनेचाच मुख्यमंत्री होत असेल, तर मला आनंद आहे. पण एकदा मला समोर येऊन सांगा. समोर या, आणि सांगा, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

मी ज्यांना माझे मानतो, त्यांच्यापैकी कितीजण तिकडे गेलेत? माझ्याविरुद्ध मतदान केल? हे महत्त्वाचं नाही. माझ्याविरोधात एकानंही मतदान केलं, तरी माझ्यासाठी ती लाजिरवाणी बाब आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.

एकच सांगेन. पदं येत असतात, जात असतात. आयुष्याची कमाई पदं नसतात. तिथे बसून तुम्ही जे काम करता, त्यानंतर जनतेची जी प्रतिक्रिया असते, ती कमाई असते. या अडीच वर्षात आपली कुठे भेट झाली? याच माध्यमातून आपण भेटलो आहोत. ही आयुष्याची कमाई माझ्यासाठी भरपूर आहे, असंही ते म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

“गायब आमदारांनी समोर येऊन सांगा मी नालायक आहे राज्य कारभार करायला”

एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, उद्धव ठाकरेंचा ‘हा’ निर्णय केला रद्द

“…तर काेणीच मुख्यमंत्री बनणार नाही, राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल”

‘संध्याकाळी 5 पर्यंत मुंबईत या, अन्यथा…’; बंडखोर आमदारांना शिवसेनेचा इशारा

“शिवसैनिकांनो काळजी करू नका, हा बाळासाहेबांचा जिगरी दोस्त अजून म्हातारा झाला नाही”