मुंबई | हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, कोरोनाविरुद्धची लढाई सुरुच ठेऊ. कोरोनाला हरवून गुढीपाडवा साजरा करु. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
जीवनावश्यक कामे सुरुच राहतील. भाजीपाला बंद होणार नाही, भाजी आणण्यासाठी एकट्यानेच जा, अत्यावश्यक गरजेशिवाय घराबाहेर पडू नका, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे.
हॉस्पिटल, वेंटीलेटर, मास्कची सुविधा अनेक जन उपलब्ध करून देत आहेत, जीवनावश्यक वस्तू, शेती माल वाहतूक थांबवलेली नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय.
दरम्यान, ज्यांचं हातावरचं पोट आहे त्यांची काळजी घेऊ, उद्योजक स्वत:हून पुढे येत आहे. कंपनी, कारखाने बंद आहेत, त्या उद्योजकांना विनंती आहे की हातावरचे पोट असणाऱ्यांचे किमान वेतन कापू नका, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
-हा व्हॉट्सअॅप नंबर सेव्ह करा आणि सर्व शंका विचारा; उद्धव ठाकरेंचं आवाहन
-पोलिसांनी तेल लावून लाठी वापरावी- अनिल देशमुख
-…तर दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देऊ!
-कोरोनाच्या संकटाची तीव्रता कमी होवो; राज ठाकरेंनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
-“योगी आदित्यनाथ नरेंद्र मोदींचं ऐकत नाही मग जनता त्यांचं का ऐकेल?”