मुंबई | आर्थिक मंदीबाबत कितीही उलटसुलट सांगितलं, तरी सत्याचा कोंबडा आरवला आहे आणि मौनीबाबा डॉ. मनमोहन सिंग यांनी सौम्य शब्दात सांगितलेल्या सत्याचा स्फोट झाला आहे. त्यांचा सल्ला गांभीर्याने घेण्यातच देशाचं हित आहे, असा सूचक सल्ला शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून सरकारला दिला आहे.
भारताचा आर्थिक विकास दर घसरल्याने प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. याचंच समर्थन करत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
अनेक वर्षांपासून अर्थव्यवस्थेचा संबंध पक्षनिधी, निवडणुका जिंकणे, घोडाबाजार या पुरताच उरला आहे. त्यातून ‘देशाची व्यवस्था’ नष्ट होत आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
आर्थिक मंदीचं राजकारण करु नये आणि तज्ज्ञांच्या मदतीने देश सावरावा, असं आवाहन मनमोहन सिंग या शहाण्या माणसाने केलं आहे. त्यांचा सल्ला गांभीर्याने घ्या, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
…तर भविष्यात लोकच माझ्यासोबत राहणार नाहीत- उदयनराजे भोसले https://t.co/o0asn0Lzpy #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 4, 2019
‘ईडी’कडून काँग्रेसच्या आणखी एका मोठ्या नेत्याला अटक! https://t.co/oammZiFokD #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 4, 2019
‘आरे’तील 2700 झाडांच्या कत्तलीविरोधात अमित ठाकरे मैदानात- https://t.co/m6NXX8JLRI @mnsadhikrut
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 4, 2019