“या अशा लोकांबरोबर 15 वर्ष राहिलो की… आणखी किती वर्ष काढायची??”

मुुंबई |  राष्ट्रवादीचे नेते उदयनराजे भोसले यांनी संपूर्ण राष्ट्रवादीला आणि पवारांना धक्का देत भाजपचं उपरणं खांद्यावर घेत हाती कमळ घेण्याचा निर्णय घेतला. पक्षप्रवेक्ष झाल्यानंतर त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीला झोडपून काढलं. या अशा लोकांबरोबर 15 वर्ष राहिलो की… आणखी किती वर्ष काढायची??, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

मी 15 वर्ष राष्ट्रवादीत राहिलो. मात्र मला त्या काळात जनतेची कामे करता आली नाही. राष्ट्रवादीत फक्त आडवा-आडवीची आणि जिरवा-जिरवीचीच कामं झाली, अशी टीका त्यांनी राष्ट्रवादीवर केली.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अनेकांनी मला पाडण्यासाठी प्रयत्न केले, असा धक्कादायक आरोप देखील उदयनराजेंनी भाजपवर केला.यंदाच्या लोकसभेला मात्र एक शेवटची संधी देऊन बघावी असं मला वाटलं, मात्र पुन्हा तेच होतंय हे लक्षात आल्यावर मी माझा निर्णय घेतला, असं ते म्हणाले. 

पहिल्या आणि दुसऱ्या निवडणुकीत जे मताधिक्यं मिळालं होतं त्यापेक्षा यंदाच्या निवडणुकीत जास्त मताधिक्यं मिळेल, असं मला वाटलं होतं. पण मताधिक्यं लांबच राहिलं मात्र घसरण एवढी झाली की, नैतिकदृष्ट्या माझा पराभव झाला. मग अशा परिस्थितीत या लोकांबरोबर दिवस काढायचे तरी किती?, असा सवाल त्यांनी विचारला.

सत्तेत असतानाही त्यांनी काही केलं नाही, मात्र तरी देखील मी सोबत होतो. माझं एकही काम त्यांनी केलं नाही,  असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

महत्वाच्या बातम्या-