भोपाळ | पालघर जिल्ह्यात झालेल्या मॉब लिचिंगच्या घटनेचे देशभरात पडसाद उमटले आहेत. सर्वच स्थरातून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. आता याप्रकरणावर मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असून ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
महान संतांच्या हत्येत होरपळून ठाकरे सरकार राखरांगोळी होईल, अशी टीका उमा भारती यांनी केली आहे. याप्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र पाठवलं आहे. तसेच उमा भारती यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
साधूंच्या जूना अखाड्याशी आपले आत्मीय संबंध आहेत. या घटनेला मी कधीच विसरणार नाही. संपूर्ण देशाने या घटनेचा निषेध केला पाहिजे, असं आवाहन उमा भारती यांनी केलंय.
दरम्यान, त्या महान संतांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी आणि या महापातकचे प्रायश्चित्त म्हणून साधू- संतांनी आहे त्याच ठिकाणी उपवास करावा, असं आवाहनी उमा भारती यांनी केलं आहे.
1.पालघर, महाराष्ट्र में संतो की जो निर्मम हत्या हुई है जिसमें से एक संत तो 70 वर्ष के थे, भयानक रूप से दुखद एवं अंतरात्मा को झकझोर झकझोर देने वाली पीड़ा हुई है। 2. वीडियो में अपराधी साफ दिख रहे हैं पुलिस भी है फिर भी यह महापाप हो गया जहां पर कि उद्धव ठाकरे जी की सरकार है।
— Uma Bharti (@umasribharti) April 20, 2020
आज मैंने माननीय उद्धव ठाकरे जी को भेजा हुआ पत्र । pic.twitter.com/nKEVz0CXBw
— Uma Bharti (@umasribharti) April 21, 2020
4. लगता है कि उद्धव ठाकरे जी की सरकार इन महान संतों की हत्या से झुलसकर राख हो जाएगी, जूना अखाड़े के साथ मेरे आत्मीय संबंध हैं मैं इस घटना को कभी भूलूंगी नहीं। सारे देश को इस घटना की निंदा करनी चाहिए।
— Uma Bharti (@umasribharti) April 20, 2020
महत्वाच्या बातम्या-
-बेजबाबदार वागून स्वत:चा, कुटुंबाचा जीव धोक्यात घालू नका- अजित पवार
-गृहमंत्री अनिल देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा- चंद्रकांत पाटील
-‘चीनने खरं काय ते सांगितल्यास…’; जर्मनीची चीनला विनंती
-कराडकरांची चिंता वाढली, आणखी दोन कोरोना पॉझिटीव्ह सापडले!
-रमजानच्या काळात मुस्लिम बांधवांनी आपल्या घरातच नमाज अदा केले पाहिजे – जावेद अख्तर