लखनऊ : जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर उत्तर प्रदेशात भाजपला ‘अच्छे दिन’ आल्याचे दिसून येत आहे. उत्तर प्रदेशात भाजपच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली असून नव्या सदस्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यापूर्वी एका दिवसाला जवळपास तीन लाख नवे सदस्य भाजपशी जोडले जात होते. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर आता ही संख्या दुपटीपेक्षा अधिक होऊन 6.7 लाख झाली आहे.
याव्यतिरिक्त ज्या जागांवर भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्या ठिकाणीही सदस्यता घेणाऱ्यांची टक्केवारी 70 टक्क्यांपंर्यंत पोहोचली आहे.
मंगळवारी लखनऊ येथील प्रदेश मुख्यालयात भाजपचे पदाधिकारी, क्षेत्र आणि जिल्ह्यांच्या प्रमुखांची बैठक पार पडली. पार पडलेल्या पत्रकार परिषदेत महामंत्री सुनिल बन्सल यांनी सदस्य जोडणीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपा पहिल्या क्रमांकावर असल्याचे सांगितले.
जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक मंजूर झाल्यानंतर भाजपला मोठं यश मिळालं आहे. ज्या ठिकाणी पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला त्या ठिकाणीही यश मिळाले आहे, असंही सुनिल बन्सल म्हणाले.
सी ग्रेड बुथवर त्या ठिकाणी असलेल्या एकूण मतदारांच्या संख्येपैकी 60 ते 70 टक्के लोकांनी भाजपचे सदस्यत्व घेतले आहे. 13 ऑगस्टपर्यंत नवे आणि जुने सदस्य मिळून 1 कोटी 36 लाख 36 हजार 316 सदस्य भाजपाशी जोडले गेले असून ही टक्केवारी देशातील भाजपाच्या सदस्यांच्या 30 टक्के आहे, असं बन्सल म्हणाले.
26 ऑगस्ट ते 31 ऑगस्टदरम्यान सदस्यांचे व्हेरिफिकेशन करण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-भारताचं मालिका विजयाचं लक्ष; आज तिसरी अंतिम लढत
-नारायण राणेंचा मनसेच्या आंदोलनाला पाठिंबा???
-मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा 21 ऑगस्टपासून सुरु होणार
-स्वातंत्र्यदिनी वीरपुत्राचा ‘वीरचक्र’ने होणार सन्मान
-राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे करणार पूरस्थितीची पाहणी